narayan rane on disha salian case : दिशा सालियन प्रकरणावरुन नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना सातत्याने धारेवर धरले आहे. या प्रकरणासंदर्भातील काही पुरावे हे नारायण राणे यांनी बंद लिफाफ्यात विधानसभेत सादर केले होते. अशातच आता पुन्हा एकदा नारायण राणे मोठा गौप्यस्फोट केला आहे.
उद्धव ठाकरेंचा मला फोन आला होता
नारायण राणे म्हणाले की, ” मला आमदार मिलिंद नार्वेकर यांनी फोन केला होता. त्यांनी नंतर उद्धव ठाकरेंकडे बोलायला दिला तेव्हा उद्धव म्हणाले की, आदित्यला सांभाळून घ्या. तुम्हालाही दोन मुलं आहेत. असं ते मला म्हणाले मग मी त्यांना म्हणालो की, तुमच्या मुलाला सात वाजेच्या नंतर बाहेर सोडू नका.”
नेमकं काय आहे प्रकरण?
हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू होण्याआधी दिशा सालियान हिचा मृत्यू झाला होता. दिशा सालियान ही सुशांतची मॅनेजर होती. दिशाने घराच्या बालकनीतून उडी मारून आत्महत्या केली अशी चर्चा होती. परंतु नंतर नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.
शरद पवारांवर टीका
नारायण राणे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, ” शरद पवार आज जे बोलतील ते उद्या असेलच असं नाही. त्यामुळे निवडणुकीच्या वेळी काय बोलतील ते कोणीही सांगू शकत नाही. असं नारायण राणे म्हणाले आहेत.
महाराजांचा दर्जेदार पुतळा बनवणार
दरम्यान, नारायण राणे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेवरून विरोधकांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ”पुतळा कोसळून किती दिवस झालेत. आता विषय बदला आणि दुसरे विषय घ्या जे लोकांच्या कामी येतील, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार आणि तो दर्जेदार बनवणार.