मनोज जरांगेंशी सकारात्मक चर्चा, विधानसभेला राज्यात तिसरा पर्याय देणार : छत्रपती संभाजीराजे

Vidhan Sabha Election : एकीकडे राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असतानाच राज्यातील जनतेला तिसऱ्या आघाडीचा पर्याय मिळण्याची शक्यता आहे. खुद्द सभांजीराजेंनी तिसरी आघाडीचा पर्याय जनतेसमोर ठेवला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
संभाजी राजे विधानसभेसाठी तिसऱ्या युतीचा पर्याय देणार
मुंबई : आघाडी विधानसभेत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. पण आता महायुती आणि महाविकास आघाडी व्यतिरिक्त राज्यात तिसरी आघाडी सुद्धा उदयास येण्याची शक्यता आहे. संभाजीराजे यांनी खुद्द याबद्दल घोषणा केली आहे. महाविकास आघाडीला हटवण्यासाठी महायुती आणा आणि महायुतीला हटवण्यासाठी महाविकास आघाडी आणा असाच खेळ सुरु आहे. यासाठीच जनतेसमोर पर्याय म्हणून तिसरी आघाडी समोर आणत आहोत अशी घोषणाच संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. मुंबईत आज छत्रपती संभाजीराजे आणि राजरत्न आंबेडकर यांची पत्रकार परिषद पार पडली. आगामी विधानसभेच्या तोंडावर राज्यात तिसऱ्या आघाडीचा पर्याय देणार अशी घोषणा दोघांनीही पत्रकार परिषदेतून केली.
Maharashtra Politics: अब की बार मविआ सरकार, पण…; सर्व्हे आला, कोणाला किती जागा? कुठे आघाडी? कुठे पिछाडी?

छत्रपती संभाजीराजे म्हणाले,”राज्यातील राजकरण नळावरील भांडण असल्यासारखे सुरु आहे. सर्व राजकरण वैयक्तिक द्वेषातून सगळे सुरु आहे. लोकसभेत लोकशाही धोक्यात आहे असे बोलून महाविकास आघाडीने मत मिळवली पण जेव्हा खरंच संविधानाला धोका असतो तेव्हा महाविकास आघाडी भूमिका घेत नाही. वक्फ बोर्ड,अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा प्रश्नांवर आघाडीकडून केंद्र सरकारला प्रश्न विचारला जात नाही”. असा नाराजीचा सूर संभाजीराजे यांनी बोलून दाखवला. यासाठीच आपण राज्यात तिसरी आघाडी देत असल्याचे संभाजीराजे यांनी बोलून दाखवले.

मनोज जरांगेंशी सकारात्मक चर्चा, विधानसभेला राज्यात तिसरा पर्याय देणार : छत्रपती संभाजीराजे

लोकसभेतील निकालावरुन जर कोणाला वाटत असेल विधानसभेत पुढे जावू तर साफ चुकीचे आहे. महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सुसंस्कृत राहिला का? याचे आत्मचिंतन करायची वेळ आली आहे. आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी एक पाऊल टाकत आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर आमच्या सोबत आले आहेत. आम्ही मराठा नेते मनोज जरांगे पाटील, प्रहार संघटनेचे बच्चू कडू,राजू शेट्टी यांच्यासोबत सकारात्मक बोलणी करत आहोत. राज्यात कसा वेगळा पर्याय देता येईल यावर चर्चा सुरु झाली आहे. राज्यातील जनतेला आम्ही नवा पर्याय देणार आहोत. जरांगे पाटील योग्य तो निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. राज्यातील ओबीसी नेत्यांसोबत सुद्धा बोलणी सुरु झाली आहे. असे मत संभाजीराजे यांनी बोलून दाखवले आहे.

लेखकाबद्दलप्रतीक्षा बनसोडेपत्रकारिता क्षेत्रातील पाच वर्षाचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सध्या डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी डीडी नॅशनल, लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये रिपोर्टर म्हणून काम केले आहे. झी २४ तासमध्ये डिजीटल टीममध्ये काम केलं आहे. राजकीय आणि सामजिक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

third alliance in maharashtraVidhan Sabha Electionछत्रपती संभाजीराजेतिसरी आघाडीमहायुतीमहाविकास आघाडीराजरत्न आंबेडकरविधानसभा निवडणुका
Comments (0)
Add Comment