Maratha Reservation: मनोज दादा! अगोदर शंकाचे निरसन करा, मगच सभा घ्या; अन्यथा आमचे आंदोलन सुरू करू

Manoj Jarange Patil: सोलापुरातील बार्शी येथील मराठा समाजबांधवांनी आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांना आधी शंकांचे निरसन करा मगच सभा घ्या असे उत्तर दिले आहे. जर उत्तर दिले नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशार देखील त्यांनी दिला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
सोलापूर(इरफान शेख): बार्शी तालुक्यातील मराठा समाजबांधव हे अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकटवत आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे लढत लढा देत आहेत, मात्र याचा फायदा महाविकास आघाडी होत आहे,असा आरोप करत अण्णासाहेब शिंदें यांनी बार्शी तालुक्यात विविध ठिकाणी बॅनरबाजी केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांना डिजिटल फलकाच्या माध्यमातून दहा प्रश्न विचारले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी याचे प्रतिउत्तर देताना, बार्शीत येऊन सभा घेऊन सर्व शंकाचे निरसन करू असे प्रतिउत्तर दिले आहे. मात्र बार्शीमधील मराठा बांधवानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत आहेत. त्यांनी मनोज दादा तुम्ही अगोदर आमच्या शंकाचे निरसन करा,मगच बार्शीत सभा घ्या. अन्यथा ९ सप्टेंबरपासून आमच्या आंदोलनास सुरुवात होणार आहे, असे अण्णासाहेब शिंदे यांनी सांगितले.
बारामतीत राष्ट्रवादीला चिमटा! शहरात झळकले देवाभाऊंचे फ्लेक्स, अजित पवारांचा फोटो न लावता डिवचण्याचा प्रयत्न

राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करणार

महाराष्ट्र राज्यात मराठा समाजातील तरुणांनी आरक्षणासाठी आंदोलने केली आणि अखेर टोकाचे निर्णय घेत आत्महत्या केल्या.आत्महत्या केलेल्या तरुणांच्या परिवारांची वाताहत होत आहे.त्यांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घ्या, अन्यथा राज्य सरकार विरोधात देखील बार्शीतून आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याची प्रतिक्रिया अण्णासाहेब शिंदे यांनी दिली आहे.
अमित शहांनी महाराष्ट्र विधानसभेसाठी गुजरातमधील आमदार,पदाधिकाऱ्यांची टीम धाडली; २ महिने तळ ठोकून राहणार

एका बाजूला मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना दुसऱ्या बाजूला सोलापुरातून मराठा समाजातील बांधवांनी प्रश्न विचारले आहेत. यात आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाने नेमकी काय भूमिका घ्यावी? महाविकास की महायुतीला पाठिंबा द्यायचा? असे १० प्रश्न जरांगेंना विचारण्यात आले आहेत. या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी अण्णासाहेब शिंदे यांनी जरांगेंना ८ दिवसांची मुदत दिली होती. जर उत्तर मिळाले नाही तर जरांगेंच्या विरोधात उपोषणाचा इशारा देण्यात आला होता.

अण्णासाहेब शिंदे यांनी बार्शीत लावलेल्या या फलकामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावर मनोज जरांगेनी दिलेल्या उत्तरावर शिंदेंसह अन्य मराठा बांधवांचे समाधान झालेले दिसत नाही. त्यामुळे जरांगे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

manoj jarange patil newsmaratha community in barshiMaratha Reservationsolapur news todayअण्णासाहेब शिंदेबार्शी मराठा समाजमनोज जरांगे पाटीलमराठा आरक्षणसोलापूर आजच्या बातम्या
Comments (0)
Add Comment