राहुल गांधी ‘मुजोर’ आहेत, ते संवेदनशीलता समजू शकत नाही; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Devendra Fadnavis On Rahul Gandhi: मालवण येथील राजकोट किल्ला परिसरातील पुतळा कोसळल्यावरून विरोधकांनी सुरु केलेल्या राजकारणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
नागपूर (जितेंद्र खापरे) : “जे संवेदनशील असतात तेच माफी मागतात आणि जे लोक संवेदनशील नसतात ते केवळ मुजोरी करतात.” असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना लागवला आहे.

राजकोट किल्ला घटनेवरून राज्यात राजकारण सुरूच आहे. विरोधकांना हा मुद्दा धरून ठेवला आहे , त्यामुळे राज्यात सातत्याने आंदोलने सुरू आहे. त्यामुळे विरोधक सरकारला घेरण्याची एकही संधी सोडत नाही आहे. नऊ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोट किल्ल्यावर बांधलेल्या पुतळ्याचे अनावरण केले होते. ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊसामुळे आणि वाऱ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला . पुतळा पडण्याच्या घटनेमुळे राज्यातील राजकारण तापले. एवढेच नाही तर पुतळा उभारणीत घोटाळा झाल्याचा आरोपही विरोधकांनी केला. मात्र, या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्य सरकारने राज्यातील जनतेची माफी मागितली आहे. एवढेच नाही तर किल्ल्यात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसवण्याची घोषणा करण्यात आली.
राणे कुटुंब संपूर्ण महायुतीला घेऊन बुडणार; घुसून मारू म्हणता म्हणजे कुणाच्या बापाचे राज्य आहे का? ‘या’ नेत्याची संतप्त प्रतिक्रिया

दरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महायुती सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भाष्य करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याबद्दल पंतप्रधानांनी माफी मागितली. त्यावर राहुल गांधी यांनी सरकारवर टीका करत म्हणाले, “जे चुका करतात ते माफी मागतात”. त्याला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींचे यांना ‘मुजोर’ असे म्हटले आहे.
Rajkot Statue Incident: देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात लागलेल्या पोस्टरची राज्यभरात चर्चा; थेट महाराजांची माफी मागितली!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जे संवेदनशील असतात तेच माफी मागतात, आणि जे लोक संवेदनशील नसतात ते केवळ मुजोरी करतात.” पुढे बोलतांना फडणवीस म्हणाले, त्यामुळे राहुल गांधी यांचा सभेमध्ये तशाप्रकारची मुजोरी करतात ते आपण बघितलंच आहे. म्हणून मला असं वाटतं या ठिकाणी मोदीजींना संवेदनशीलता आहे. की त्यांनी या बाबतीत माफी मागितली, पण मुजोरांचा ते कधीच लक्षात येऊ शकत नाही, असेही फडणवीस म्हणाले.

राहुल गांधी ‘मुजोर’ आहेत, ते संवेदनशीलता समजू शकत नाही; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

काल याच घटनेवरून फडणवीसांच्या मतदारसंघात “महाराज आम्हाला माफ करा”असे लिहिले बॅनर लावण्यात आले होते.

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Devendra Fadnavisdevendra fadnavis on rahul gandhiउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसछत्रपती शिवाजी महाराज पुतळाराजकोट किल्लाराहुल गांधी
Comments (0)
Add Comment