Woman Died In Local Train Accident: अंबरनाथ-बदलापूर स्थानकादरम्यान लोकलमधून पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ती दारात उभी असताना गर्दीमुळे तिचा हात सुटला आणि ती लोकलमधून खाली पडली, त्यातच तिचा मृत्यू झाला आहे.
हायलाइट्स:
- अंबरनाथमध्ये लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू
- अंबरनाथ बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान घटना
- गर्दीमुळे महिला पडल्याची प्राथमिक माहिती
ऋतुजाने ठाण्यावरुन गाडी पकडली. पण, गर्दी इतकी होती की ती आत जाऊ शकली नाही. त्यात ती अंबरनाथला गाडीतून उतरली आणि पुन्हा गाडीत चढली. पण, गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याने तिचा हात सुटला आणि ती गाडीतून पडली. यादरम्यान जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला.
ऋतुजा ही ठाण्याला एका खासगी ट्रॅव्हल कंपनीत कामाला होती, अशी माहिती आहे. मंगळवारी रात्री ठाण्याहून तिने कर्जत ट्रेन पकडली. यावेळी अंबरनाथ रेल्वे स्थानकात गर्दीमुळे ती खाली उतरली आणि पुन्हा ट्रेनमध्ये चढली. पण, गर्दी इतकी प्रचंड होती की तिला आत जाताच आलं नाही. त्यामुळे ती दारात उभी राहिली. अंबरनाथ स्थानकातून ट्रेन सुटताच अवघ्या काही अंतरावर तिचा हात सुटला आणि तोल जाऊन ती गाडीतून खाली पडली.
Mumbai Local: लोकलच्या गर्दीचा आणखी एक बळी, हात सुटला अन् आयुष्य संपलं, अंबरनाथमध्ये महिलेचा दुर्दैवी अंत
त्यानंतर या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ऋतुजाला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. या घटनेने मध्य रेल्वेवरील लोकलच्या गर्दीचा प्रश्न किती भीषण आहे हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून प्रवाशांनी गर्दीतून प्रवास करत असताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.