‘भाजप आणि अजित दादांच्या पक्षाकडून मतदारसंघात ३०-४० कोटी वाटले जाणार’, पवार गटाच्या बड्या नेत्याचा आरोप

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर राज्यात आचारसंहिता सुरू आहे. पोलीस कडक नाकाबंदी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात दोन ठिकाणी मोठी रक्कम सापडली, याचाच धागा पकडत शरद पवार गटाच्या नेत्याने भाजप आणि अजित दादांच्या पक्षावर गंभीर आरोप केले आहेत.

हायलाइट्स:

  • महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून आचार संहितेची अंमलबजावणी सुरू आहे.
  • पुण्यातील शिवापूर टोल नाक्यावर ५ कोटी रूपयांची कॅश सापडली, त्यानंतर जळगावमध्येही दीड कोटी रूपयांची कॅश आढळली.
  • शरद पवार गटाच्या नेत्याने महायुतीवर गंभीर आरोप करत ३०-४० कोटी रूपये प्रत्येक मतदारसंघात वाटणार असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सोलापूर : विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून राज्यात आचार संहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरात पोलीस नाकाबंदी करून गाड्यांची तपासणी करत आहेत. आता दोन ते तीन दिवसांपूर्वी पुण्यातील शिवापूर टोल नाक्यावर ५ कोटी रूपयांची कॅश आढळली होती. अशातच जळगावमध्ये बुधवारी रात्री दीड कोटी रूपयांची कॅश सापडल्याने खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना रोहित पवारांनी महायुतीवर खळबळजनक आरोप केले आहेत. महायुतीमधील भाजप आणि अजित दादांचा पक्ष येत्या निवडणुकीमध्ये ३०-४० कोटी रूपये वाटणार असल्याचं म्हटलं आहे. शिवापूर टोलनाक्यावर सापडलेले पैसे शहाजी बापू पाटील यांचे नाव समोर आले होते. रोहित पवारांनी ते फक्त पाच कोटी नसून २० ते २५ कोटी रूपये असल्याचा दावा केला होता. यावर बोलताना, रोहित पवार काय पैसे मोजायला गेले होते का? अशी टीका शहाजी पाटलांनी केली होती. यावर रोहित पवारांनी प्रत्युत्तर देताना महायुतीमधील पक्ष प्रत्येक मतदारसंघात पैसे वाटणार असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
MVA Seat Sharing: ८५ पर्यंत आलोय, सेंच्युरीसाठी १५ च बाकी, कधीही… संजय राऊतांचे पुन्हा 100+ चे संकेत
पाच कोटी त्यांचे होते असं म्हणायचं का? त्यांच्या कार्यकर्त्यांची नावं एफआयआरमध्ये समोर आली आहेत. आम्हाला समजलेल्या माहितीनुसार सहा ते सात गाड्या होत्या, एक गाडीमध्ये दोन पोती होती त्यामध्ये पाच कोटी सापडले असं ते म्हणतात. पण खऱ्या अर्थाने २५ ते ३० कोटी निधी त्यामध्ये होता. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी झाडं आणि डोंगर पाहण्यासाठी ते सर्व आमदार गेले होते. तसच भाजप असेल अजित दादांचा पक्ष असेल प्रत्येक मतदारसंघामध्ये ३०-४० कोटी रूपये खर्च करणार आहेत. त्यांचा लोकांवर विश्वास राहिलेला नाही. त्यांना असं वाटतं की पैसा ओतला की स्वाभीमानी लोकांना विकत घेता येतं. पण लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या स्वाभीमाना लोकांनी दाखवून दिलं आहे की निष्ठा विचार हे महत्त्वाचे असतात, असं म्हणत रोहित पवारांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

संतांनी आपल्याला सांगितलं कोणताही भेदभाव न करता बंधुभाव जपत आपल्याला लढायचं असतं. त्याच विचाराने आम्ही लढत असतो, त्यामुळे पैसा कितीही ओतला तरी स्वाभीमानी नागरिक हे महाविकास आघाडीसोबत राहतील, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या कमीत कमी १८० जागा निवडून येतील, असंही रोहित पवार म्हणाले.

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

Rohit Pawarvidhansabha election 2024अजित पवारभाजपरोहित पवारविधानसभा निवडणुक २०२४शरद पवार गट
Comments (0)
Add Comment