ठाकरेंनी मतदान केलेली उमेदवार ‘मातोश्री’वर; म्हणते… दादा, ‘ती’ सीट काँग्रेसला सोडा ना

Varsha Gaikwad meets Uddhav Thackeray : वर्सोवा मतदारसंघात अस्लम शेख यांची त्यांचे जावई सैफ खान यांना उमेदवारी मिळावी अशी इच्छा आहे.

हायलाइट्स:

  • महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत काँग्रेसने उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
  • वर्सोवा मतदारसंघात अस्लम शेख आणि सैफ खान यांची उमेदवारीसाठी चर्चा झाली.
  • काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुंबईतील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली.
महाराष्ट्र टाइम्स

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत गुरुवारी काँग्रेस नेत्यांच्या ‘मातोश्री’वरील भेटीगाठी सुरूच होत्या. मुंबईतील काही जागांवरील दावा सोडावा, या मागणीसाठी काँग्रेस नेत्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.वर्सोवा मतदारसंघात अस्लम शेख यांची त्यांचे जावई सैफ खान यांना उमेदवारी मिळावी अशी इच्छा आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींमधील एका मोठ्या दक्षिण भारतीय नेत्याचा अस्लम शेख यांच्या पाठीवर हात असल्याचे काँग्रेसमध्ये बोलले जाते. त्यामुळे शिवसेनेने (उबाठा) काहीही करून ही जागा सोडावी, असे आर्जव वर्षा गायकवाड आणि शेख यांनी ‘मातोश्री’वर जाऊन केल्याचे समजते. विदर्भातील काही जागांसाठी सुनील केदारही ‘मातोश्री’वर पोहोचल्याचे कळते.

वर्षा गायकवाड या उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीत त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे कुटुंबाचे मतदान असते. लोकसभेला हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला होता. मविआच्या एकीमुळे ठाकरेंनी माझं मत काँग्रेसच्या वर्षाताईंना असं सांगितलं होतं. त्यामुळे ठाकरेंनी मतदान केलेल्या उमेदवारानेच आता काँग्रेसला जागा सोडण्याचं आव्हान केल्याचं दिसतं.
Aaditya Thackeray Net Worth : 4.2 लाखांची BMW कार, 1.9 कोटींचे दागिने, खालापूरची जमीन; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
दरम्यान, उद्धव ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले. वांद्रे पूर्वची उमेदवारी यादीतच जाहीर झाल्याने त्या जागेबाबत चर्चा होणेच शक्य नाही. भायखळा, वर्सोवा मतदारसंघांबाबतही शिवसेना (उबाठा) ठाम असल्याचे कळते.

Uddhav Thackeray : ठाकरेंनी मतदान केलेली उमेदवार ‘मातोश्री’वर; म्हणते… दादा, ‘ती’ सीट काँग्रेसला सोडा ना

राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप निश्चित करण्यासाठी अनेक दिवसांपासून सर्व प्रमुख नेत्यांच्या बैठकांचा धडाका सुरू होता. या चर्चेत प्रमुख नेत्यांमध्ये हमरीतुमरीही झाली. त्यानंतर बुधवारी झालेल्या बैठकीत यावर तात्पुरता तोडगा काढण्यात आला. मात्र मुंबईतील आणि विदर्भातील जागांबाबत तोडगा न निघाल्याने गुरुवारी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यासह माजी मंत्री अस्लम शेख यांनी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत मुंबईतील जवळपास सर्वच राजकीय परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. त्याशिवाय भायखळा आणि वर्सोवा या मतदारसंघांबाबतही चर्चा करण्यात आल्याचे कळते.
Pratap Patil Chikhalikar : माजी मुख्यमंत्र्यांना पाडणाऱ्या जाएंट किलरचा भाजपला रामराम, दादा गटाला सीट सुटल्याने मोठा निर्णय
काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार हेसुद्धा संध्याकाळी ‘मातोश्री’वर पोहोचल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. रामटेक विधानसभा मतदारसंघासाठी केदार आणि ठाकरे यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाली, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. विदर्भातील इतरही काही जागांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे कळते.

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Maharashtra politicsMatoshreeUddhav Thackerayvarsha gaikwadVersova Vidhan SabhaVidhan Sabha Nivadnukअस्लम शेखठाकरे वर्षा गायकवाड भेटमविआ विधानसभा उमेदवारमहाविकास आघाडी जागावाटप फॉर्म्युलावर्षा गायकवाड मातोश्रीवर
Comments (0)
Add Comment