बॅलेट पेपरवरील मतदानाचा निर्णय मागे, प्रशासनाच्या दबावाने मारकडवाडीची माघार, जानकरांची घोषणा

Uttamrao Jankar : प्रशासनाच्या भूमिकेमुळे मतदानच करु द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांचा प्लॅन आहे, त्यामुळे आम्ही गावकऱ्यांसोबत चर्चा करुन थांबण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा जानकर यांनी केली.

Markadwadi : बॅलेट पेपरवरील मतदानाचा निर्णय मागे, प्रशासनाच्या दबावाने मारकडवाडीची माघार, जानकरांची घोषणा

सोलापूर : माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी येथील गावकऱ्यांनी ईव्हीएमवर संशय घेत बॅलेट पेपरवर मतदान करण्याबाबत घेतलेला निर्णय मागे घेतला आहे. प्रशासनाच्या दबावानंतर मतपत्रिकेवर मतदान करण्याची प्रक्रिया थांबवण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी घेतली. पोलिसांसोबत बैठक झाल्यानंतर मारकडवाडी येथील ग्रामस्थांशी चर्चा करुन जानकरांनी आपला निर्णय माध्यमांसमोर मांडला.

उत्तमराव जानकर काय म्हणाले?

पोलीस प्रशासनासोबत सुरुवातीला चर्चा केली. एकही मतदान केलंत, तर तुमचं सगळं साहित्य, त्या मतपत्रिका असतील किंवा मतपेट्या असतील, सगळं आम्ही गुंडाळून घेऊन जाऊ, असं त्यांनी सांगितलं. तुमच्या सर्वांवर गुन्हे दाखल करणार आहोत, आधीच आम्ही कलम १४४ लागू केलं आहे, असं पोलिसांनी सांगितल्याचं उत्तम जानकर म्हणाले.

माघार घेण्याचं कारण काय?

प्रशासनाच्या भूमिकेसंबंधी ग्रामस्थांशी चर्चा केली. गावकऱ्यांचं म्हणणं आहे, की जर मतदानच करु देणार नसतील, आपण पेट्या धरुन ठेवणार आणि ते हिसकावणार, यात गोंधळ उडेल, झटापट होईल आणि लोक निघून जातील, जी मतदानाची प्रक्रिया आहे. किमान १५०० मतदान झाल्याशिवाय निकाल येऊ शकत नाही. ते १५०० मतदान मला होणार होतं, पण प्रशासनाच्या भूमिकेमुळे मतदानच करु द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांचा प्लॅन आहे, त्यामुळे आम्ही गावकऱ्यांसोबत चर्चा करुन थांबण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा जानकर यांनी केली.
Pune Crime : मोड आलेले हरभरे खाल्ले नाहीत, बायकोने लाटणं-भांड्याने बेदम मारलं, नवऱ्याची पँट खेचली, पुण्यातील प्रकार
येत्या आठ दिवसात प्रांत कार्यालयात चर्चा करुन किंवा योग्य ठिकाणी ताकदीने न्याय मागू. तालुक्यातील २५ ते ५० हजार लोकांचा आक्रोश निवडणूक आयोग आणि न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचवू, न्याय मिळाल्याशिवाय उत्तमराव जानकर थांबणार नाही, असा एल्गार त्यांनी केला.
Raj Thackeray : मला अमान्य आहे, पुन्हा जबाबदारी घे; राज ठाकरेंनी फोन फिरवला, अविनाश जाधवांनी राजीनामा फिरवला
खरं तर लाठ्या मारा किंवा गोळ्या घाला; अशी भूमिका घेत मारकडवाडी येथील गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर मतदान करण्याची भूमिका घेतली होती. मात्र मतदानाच्या दिवशी मतपत्रिकेवर प्रक्रिया सुरु होण्याच्या तोंडावर त्यांना माघार घ्यावी लागली.

शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर येथे भाजप उमेदवार राम सातपुते यांचा पराभव करुन विजयीही झाले. मात्र बहुतांश महाविकास आघाडी समर्थक असताना हजारोंचं मतदान अपेक्षित असूनही आपल्याच गावातील मतांची संख्या रोडावल्याने गावकरी आक्रमक झाले होते. त्यांच्या गावात चक्क भाजप उमेदवाराला आघाडी मिळाल्याचे दिसल्याने ईव्हीएम मतमोजणीवर संशय व्यक्त केला जात आहे.

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Malshiras Vidhan Sabha NivadnukMarkadwadiMarkadwadi vote on Ballot paperram satputesolapur newsuttamrao jankarउत्तमराव जानकर निर्णयमारकडवाडी ईव्हीएम विरोधात आंदोलनमारकडवाडी बॅलेट पेपर मतदान मागेमारकडवाडी मतपत्रिका मतदान
Comments (0)
Add Comment