‘प्रभूरामाच्या नावे घोटाळ होत असेल तर…’, राम मंदिर घोटाळ्यावर संजय राऊतांची मोठी मागणी

हायलाइट्स:

  • श्री रामजन्म तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर गंभीर भ्रष्टाचाराचा आरोप
  • राम मंदिर हा श्रद्धा आणि आस्थेचा विषय
  • ट्रस्टकडून खुलासा करण्यात यावा, राऊतांची मागणी

मुंबई : धर्मनगरी अयोध्येत राम मंदिर बनवत असलेल्या श्री रामजन्म तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर गंभीर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमिवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. ट्रस्टची स्थापना करताना सगळ्या भाजपच्या सदस्यांना घेण्यात आलं आहे. आमच्या पक्षाचा एकही सदस्य नाही. यामुळे जर घोटाळा झाला असेल तर त्याची चौकशी करावी आणि ट्रस्टकडून खुलासा करण्यात यावा असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राम मंदिराच्या निर्माणासाठी जगभरातून निधी आला. हा निधी लोकांनी श्रद्धेपोटी दिली आहे. अनेक ठिकाणाहून देणग्या गोळा केल्या गेल्या. राम मंदिर हा श्रद्धा आणि आस्थेचा विषय आहे घोटाळ्याचा विषय नाही. त्यामुळे जर निधीचा गैरवापर होत असेल तर ट्रस्टच्या प्रमुखांनी खुलासा करावा अशी मागणी यावेळी संजय राऊत यांनी केली आहे.

ट्रस्टने समोर येऊन आरोपांचा खुलासा करावा इतकंच नाहीतर यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि भाजपच्या नेत्यांनी खुलासा करणं गरजेचं आहे, असंही यावेळी राऊत म्हणाले.

शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरणार, दूध दरासाठी १७ जूनला राज्यभर मोर्चे
काय आहे राम मंदिर घोटाळा?

अयोध्येत राम मंदिर बनवत असलेल्या श्री रामजन्म तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. आम आदमी पार्टी (आप) आणि समाजवादी पक्षाने श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. यामध्ये असं म्हटलं आहे की, ‘दोन कोटी रुपयांची जमीन फक्त ५ मिनिटानंतर 18.5 कोटींमध्ये खरेदी करून मोठा घोटाळा केला आहे.

आप आणि एसपी यांनी आता यासंदर्भात अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआयमार्फत चौकशीची मागणी केली आहे. तर दुसरीकडे, चंपत राय यांनी आरोपांचे स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे की, ‘आमच्यावर महात्मा गांधी यांच्या हत्येचा आरोपही करण्यात आला होता. त्यामुळे अशा प्रकारच्या आरोपांना घाबरत नाही आणि याची चौकशी करून घेऊ.’

अयोध्याच्या हनुमानगढ़ीचे महंत राजू दास आणि रामललाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून निषेध नोंदवला आहे. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर केलेला आरोप निराधार आहे. हे शक्य नाही. रामभक्तांनी दान केलेल्या पैशाचा हा अपमान आहे. हे आरोप निराधार ठरले तर ज्या लोकांनी हे आरोप केले त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी यावेळी आचार्य सत्येंद्र दास यांनी केली आहे.
‘भाजपला एका वर्षात ७५० कोटींच्या देणग्या; शिवसेनेकडे लोकांची श्रीमंती’

Source link

Ram Mandir Donationram mandir land scamRam Mandir newsram mandir trustram mandir trust corruptionram mandir trust fraudram mandir trust scamram navami 2021ram temple scamSanjay Raut
Comments (0)
Add Comment