शहरवासीयांच्या ज्वलंत प्रश्नाला राजकीय वळण देऊ नका – करण पाटील लोकनियुक्त नगराध्यक्ष

पारोळा शहरातील प्रत्येक नागरिकास व प्रत्येक घरास चोवीस तास पाणी देण्याचे आमचे स्वप्न आणि त्या कामाला ब्रेक लावू नका.पारोळा शहरातील वाढती लोकसंख्या व वाढलेल्या कॉलनी परिसर त्यास लागणारा फिल्टरेशन प्लांट. सध्या असलेला प्लांट व पाइप लाईन हे जीर्ण झालेले आहेत. त्याच्या वाढीसाठी व नूतनकरणासाठी आमचा शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. यात जलशुध्दीकरण केंद्र,संपूर्ण शहरात पाइप लाईन,पाण्याच्या टाक्या यासह विविध प्रकारच्या उपाय योजना करण्यासाठी 40 ते 42 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. व त्यात पाण्याची टाकी सुध्दा आहे. यासाठी मी स्वतः प्रयत्नशील असून त्याचे संपूर्ण तपशीलासह नगरपालिकेतर्फे मंत्रालयात सादर केलेले आहेत, कोरोणाच्या काळामुळे शासनाकडून निधी वाटप करण्यात आलेला नाही.एवढा मोठा प्रोजेक्ट राबवितांना शासनाला सर्व प्रकारच्या बारीक सारीक मुद्द्यांचा अभ्यास करावा लागतो. आपल्या शहरातील काही मंडळी एक कोटी निधी आणून असा आव आणतात, पाणी टाकी बांधली गेली तर लोकांना दररोज पाणी मिळेल. त्यांची मलाकीव येते. लोकांना मूर्ख बनवण्याचे दिवस गेले आता, निवडणुकीच्या तोंडावर सामान्य जनतेच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम शहरात सध्या सुरू आहे. उलट या एक कोटी मंजुरीमुळे आपल्याला जो आपल्या हक्काचा 24 तास पाणी देण्याचा प्रश्न होता त्याला आता एक वेगळीच दिशा मिळण्याची शक्यता आहे. पाण्याच्या टाकी साठी निधी तर आम्ही ही आणि शकलो असतो पण मला 24 तास पाणी देण्याचे आश्वासन पूर्ण करायचे आहे, शहरातील जीर्ण झालेली पाईपलाईन, जल शुद्धीकरण केंद्र हे घटक पहिले बनविणे महत्त्वाचे आहे. आणि त्यानंतर पाण्याच्या टाकी चा विषय येईल. माजी विरोधकांना हात जोडून विनंती राहील की पारोळा शहरवासीयांच्या या ज्वलंत प्रश्नाला आपण वेगळे राजकीय वळण देऊ नका,1 कोटी निधी आणून दररोज पाणी देण्याचे स्वप्न लोकांना दाखवू नका.

निवडणुकीच्या तोंडावर जुमलेबाजी करून लोकांना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करू नका…पारोळा शहरातील नागरिक सुज्ञ असून माझा त्यांच्यावर दृढ विश्वास आहे ते जुमेलबाजीला भिक घालणार नाही

करण बाळासाहेब पाटील

लोकनियुक्त नगराध्यक्ष पारोळा

Comments (0)
Add Comment