‘पुण्यात राहायला आलो तर मी राज ठाकरेचा राज मोरे होईन का?’

हायलाइट्स:

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात पत्रकार परिषद
  • नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर पुन्हा स्पष्ट केली भूमिका
  • नारायण राणेंना अभिनंदनासाठी फोन केल्याचीही दिली माहिती

पुणे: नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून सध्या सुरू असलेल्या वादावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. नामकरणाचा वाद निरर्थक आहे,’ असं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. (Raj Thackeray on Naming of Navi Mumbai Airport)

पुण्यातील नवी पेठ येथील मनसेच्या नव्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आज राज ठाकरेंच्या हस्ते झाले. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नवी मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळास शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. तर, स्थानिकांनी लोकनेते दि. बा. पाटील यांचंच नाव विमानतळास असावं, असा आग्रह धरला आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वी हजारोंच्या संख्येनं स्थानिक लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं. या निमित्तानं शिवसेना व भाजप असा वाद रंगल्याचंही चित्र आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजपनं कपिल पाटील यांना संधी देऊन शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेताच कपिल पाटील यांनीही नामकरणाच्या संदर्भात भाष्य केलं होतं. दि. बा. पाटील यांचं नाव नवी मुंबईच्या विमानतळास असावं अशी स्थानिकांची मागणी आहे. माझाही त्यास पाठिंबा आहे. त्यामुळं या प्रश्नात मी लक्ष घालेन, असं ते म्हणाले होते.

वाचा:एकनाथ खडसेंच्या सीडीची वाट पाहतोय; राज ठाकरेंचा चिमटा

राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच यावर भाष्य करताना विमानतळाला नवं नाव देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं म्हटलं होतं. हे विमानतळ मुंबईतील विमानतळाचं एक्स्टेन्शन आहे. त्यामुळं त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव राहील, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्याच भूमिकेचा त्यांनी आज पुनरुच्चार केला. ‘छत्रपतींचं नाव आहे, ते बदलायचा विषय कुठे येतो? मी तिसऱ्या कुठल्या तरी नावाची मागणी केलेली नाही. तांत्रिकदृष्ट्या दुसरं नाव येऊच शकत नाही. ‘विमानतळाची जागा बदलली म्हणून नाव बदलेल का? मी पुण्यात स्थायिक झालो तर राज मोरे होईन का? राज ठाकरेच राहणार,’ असं त्यांनी स्पष्ट केलं.

नारायण राणेंना फोन केला होता, पण…

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर मी त्यांना अभिनंदनासाठी फोन केला होता. मात्र, त्यांचे दोन्ही फोन बंद होते. त्यांच्या मुलांचेही फोन बंद होते. मी आता पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधणार आहे,’ असं राज यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.

वाचा: सहकार क्षेत्रासाठी केंद्रात नवं खातं; शरद पवार म्हणतात…

Source link

navi mumbai airportraj thackerayraj thackeray in puneRaj Thackeray on Navi Mumbai Airportकपिल पाटीलनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळनवी मुंबई विमानतळनारायण राणेपुणेराज ठाकरे
Comments (0)
Add Comment