पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी महाराजांचं नाव घेतात. महाराष्ट्रात भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांनी या प्रकाराबद्दल उत्तर द्यावं, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. शिवाजी महाराजांनी तशी वाक्य वापरली नाहीत, मी त्यासंदर्भातील स्पष्टीकरण देत बसणार नाही. कुठलाही विषय झाला की त्याची तुलना शिवाजी महाराजांसोबत करणं योग्य नाही. सुधांशू त्रिवेदी यांनी केलेलं वक्तव्य दु्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना कशाला यामध्ये ओढता. तुमच्या पक्षांमध्ये जे सुरु आहे ते तुमच्यात राहूद्यात. महाराजांना यामध्ये का ओढता, असा सवाल संभाजीराजे यांनी केला.
शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या पायदळी कोश्यारी, त्रिवेदी!; शिवसैनिकांची पोलिसांशी झटापट
शिवाजी महाराजांची व्यापी खूप मोठी होती. कोणताही विषय आला तरी आपण शिवाजी महाराजांना कोट करता. लोक पाहात आहे जे काही सुरु आहे ते, तक्रार करुन काय समाज हे पाहतोय, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
FIFA World Cup 2022: फुलबॉल वर्ल्ड कपसाठी भारताचा एकही संघ नाही, पण कोल्हापुरात तुफान फिव्हर
राज्यपालांना बाहेर काढावं
राज्यपाल असे का बडबडतात मला समजत नाही परवा सुद्धा मी म्हटलं होतं की यांना महाराष्ट्रातून बाहेर पाठवून द्या. मी हात जोडून पंतप्रधानांना विनंती करू इच्छितो की अशी व्यक्ती आम्हाला महाराष्ट्रात नको आहे. या महाराष्ट्राचे वैभव छत्रपती शिवाजी महाराज असतील महापुरुष असतील ही संतांची भूमी आहे. इतका घाणेरडा शब्द आणि इतके घाणेरडे विचार राज्यपालांच्या मनामध्ये येऊ कसे शकतात आणि यांना राज्यपाल म्हणून ठेवता तरी असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी परभणीत केला होता. आज देखील या संदर्भात पुन्हा विचारलं असता त्यांनी राज्यपालांनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल देखील त्यांनी यापूर्वी वक्तव्य केली आहेत. आता त्यांना महाराष्ट्रातून बाहेर न्यावं, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
सूर्यकुमार यादवने सांगितलं आपल्या तुफानी फटकेबाजीचं सिक्रेट, म्हणाला ‘तुम्ही पर्वा न करता जेव्हा…’