२० नोव्हेंबरला मुंबईतील शिवाजी मंदीरमध्ये उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर प्रबोधनकार.डॉट. कॉम या वेबसाईटच्या रिलाँचिंगच्या निमित्तानं एकत्र आले. या कार्यक्रमानंतर प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गट आणि आम्ही निवडणूक जाहीर झाली एकत्र येऊ असं म्हटलं. त्यामुळं शिवसेना ठाकरे गट आणि वंचितची युती झाल्यास मविआचं काय होणार असा सवाल विचारला जात होता. मात्र, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मतांची विभागणी टाळण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यावं, असं म्हटलं. आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चेला तयार असल्याचं देखील अजित पवार म्हणाले. आता त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी होणार का या संदर्भात चर्चा सुरु आहेत.
अंबादास दानवेंनी बोलावलेल्या बैठकीत शिवसेना आमदारांची नाराजी!, कारणही समोर
अजित पवार काय म्हणाले?
अजित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना वंचित बहूज आंबेडकर गट, गवई पक्ष, आठवले गट, कवाडे गट आहेत. गट म्हणण्यापेक्षा पक्ष आहेत. रामदास आठवले तिकडे जाऊन मंत्री होई पर्यंत आम्ही सोबत निवडणुका लढवल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आमच्या त्या त्यावेळच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केली होती. दिवंगत नेते आर. आर. पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली होती. त्याबद्दल त्यांनी तशी माहिती दिली होती. समविचारी पक्षांची मतविभागणी होऊ नये यासाठी आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतचर्चा करण्यासाठी तयार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.
देवेंद्र यांच्या भावाने मैदान मारलं, पुणे विद्यापीठ सिनेट निवडणुकीत प्रसेनजीत फडणवीस विजयी
शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादीचा ग्रीन सिग्नल, काँग्रेसचं काय?
वंचित बहुजन आघाडीसंदर्भात शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सकारात्मक भूमिका दाखवली आहे. दुसरीकडे काँग्रेसनं अद्याप त्यांची भूमिका मांडलेली नाही. वंचित बहुजन आघाडीनं यापूर्वी शिवसेना आणि काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, राष्ट्रवादीसोबत वंचितची आघाडीची तयारी नव्हती. आता बदललेल्या राजकीय स्थितीत काय घडेल हे आगामी काळात स्पष्ट होईल.
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत बिघडली; पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू