भाजप नेते आणि प्रवक्त्यांमध्ये वादग्रस्त विधानांची स्पर्धा सुरु : भास्कर जाधव

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांची तोफ पुन्हा एकदा धडाडलली आहे.मुख्यमंत्र्यांचा गुवाहटी दौरा,राज्यपालांनी केलेल वादग्रस्त विधान, बाबा रामदेव यांनी महिलांबद्दल केलेल वक्तव्य, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न ते गुणरत्न सदावर्तेंनी केलेली वेगळया मराठवाडयाची मागणी या सगळ्या मुद्यांवर जाधव यांनी रोखठोक भाष्य केलं. भाजपचे नेते आणि प्रवक्त्यांमध्ये वादग्रस्त विधानांची जणू स्पर्धाच लागली आहे. ही विधाने भाजपशी संबंधित लोक करत आहेत म्हणून ते गप्प आहेत अन्यथा भाजपने देशभरात गोंधळ घातला असता, अशी बोचरी टीका जाधव यांनी केली.

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्य असेल किंवा राष्ट्रपुरुषांबद्दल केलेली वादग्रस्त विधाने असतील त्यांनी यापूर्वी मराठी माणसाचा अपमान होईल, अशी विधानं केली आहेत. राज्यपाल हे पद घटनात्मक जरी असले तरी त्यांची नियुक्ती ही भाजपने केली आहे. त्या पदाचा आब राखण्याची माझी जबाबदारीच नाही या अविर्भावात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वावरत असल्याची टीका भास्कर जाधव यांनी केली आहे. बाबा रामदेवही भाजपचे हितचिंतक आहेत त्यांनीही महिलांबद्दल चुकीचे विधान केले. पण, हेच विधान दुसऱ्या कोणी केल असत तर भाजपने देशभर गोंधळ घातला असता. भाजपमध्ये राष्ट्रपुरुषांचा, शहिदांचा,देशभक्तांचा वादग्रस्त विधान करत अपमान करण्याची स्पर्धाच लागली आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले अनंतात विलीन, उद्धव ठाकरेंचा शिंदेगटावर वार… वाचा, टॉप १० न्यूज बुलेटीन

भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्या गुवाहटी दौऱ्याबद्दल भाष्य केलं. त्यांनी यापूर्वी उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीचे सरकारला ठाकरेंना सत्तेतून खाली खेचाण्याचा नवस असावा. तो नवस पूर्ण झाल्याने ते गेले असावेत पण खरे तर एकनाथ शिंदे सत्तेतच होते स्वतः मंत्री होते असेही त्यांनी सुनावले. आता ते गेले आहेत ते भाजपचे सरकार खाली खेचण्यासाठी नवस बोलणार असतील अशी उपहासात्मक टीका जाधव यांनी केली. आता राज्यातले सगळे उद्योगप्रकल्प बाहेर जात आहेत राज्य अधोगतीला चाललंय हे सगळं थांबावं असं साकडं घालत त्यांनी कामाख्या देवीला नवस करावा, असा सल्लाही आमदार भास्कर जाधव यांनी दिला आहे

गोखलेंच्या सगळ्या भूमिका मला मान्य होत्या असं नाही पण… राज ठाकरेंकडून शब्दसुमनांची आदरांजली

सदावर्ते यांच्या भूमिकेमागे भाजपचे तर षडयंत्र नाही ना?

गुणरत्न सदावर्ते हे भाजपाचेच समर्थक असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला. मराठवाडा आणि विदर्भ वेगळा करण्याची भाषा एककाळी भाजपनेच केली होती. तो त्यांचा एकेकाळी अजेंडा होता. ती मागणी आता गुणरत्न सदावर्ते करत आहेत. एसटी कर्मचारी आंदोलनाच्या वेळेला सुद्धा त्यांनी घातलेला गोंधळ आणि त्यानंतर त्यांना जेलंमध्ये जावं लागलं होतं. भाजप स्वतः गप्प राहून दुसऱ्यांना बोलायला लावते त्यातलाच हा प्रकार आहे. ते कधी मराठा आरक्षण विरोधात बोलतात ते वेगवेगळ्या भूमिका घेतात यामागे भाजपचे तर षडयंत्र नाही ना?असा सवाल करत याचा शोध घेण्याची गरज आहे, असे मत यावेळी भास्कर जाधव यांनी व्यक्त केले.

उद्धव ठाकरेंनी बुलढाण्यातून ललकारलं, भावना गवळींचं थेट गुवाहाटीतून प्रत्युत्तर, म्हणाल्या..

Source link

Bhaskar JadhavEknath ShindeEknath Shinde Assam TourMaharashtra politicsshivsena newsUddhav Thackerayउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेभास्कर जाधव
Comments (0)
Add Comment