राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
राज ठाकरे यांनी २०१४ साली निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मातोश्रीवरील एक किस्सा सांगितला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या अखेरच्या दिवसांमध्ये मातोश्रीवर त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतली जात नसल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. बाळासाहेबांच्या अखेरच्या दिवसांत मी माझ्या घरून त्यांच्यासाठी चिकन सूप पाठवत असे. बाळासाहेब जेव्हा लीलावती रुग्णालयात दाखल होते तेव्हा उद्धव ठाकरे त्यांना तेलकट बटाटेवडे खायला द्यायचे. जे बाळासाहेबांच्या तब्येतीसाठी घातक ठरले होते, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.
विकासाच्या मुद्द्यांना माझे प्राधान्य: आदित्य ठाकरे
केंद्र सरकारकडून राज्याला समज देणारे पत्र आले आहे. कृषीमंत्री, उद्योग मंत्री बेताल वक्तव्ये करतात. मंत्रिमंडळात एकही महिला नाही. सात आठ वेळा एक मंत्री अपशब्द काढतात. मंत्रिमंडळ विस्तार नाही. मी परत परत प्रकल्पावर बोलणार कारण आज विकासाची राज्याला गरज. मी राजकीय बोललो परंतु विकासाचे मुद्दे महत्वाचे, महागाई, सामान्य नागरिकांचे विषय यालाच माझे प्राधान्य असेल, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
आदित्य ठाकरे आणखी काय म्हणाले?
मविआ सरकारच्या काळात ९३% सही झालेले एमओयू हे टाईम्सने प्रकाशित केले. त्याची यादी देतो. सरकार बदलले तर तुम्हीच वातावरण बदलवले. टाटाचे कुठले अधिकारी म्हणाले महाराष्ट्रात गुंतवणूकीची परिस्थिती नाही. त्याचे नाव उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेले नाही. हे सरकार अल्पायुषी. म्हणून उद्योग महाराष्ट्रात येत नाहीएत. गद्दार आमदार मनासारखे वागतात, दडपशाही करतात यात उपमुख्यमंत्री यांचे नाव खराब होते. उद्योगमंत्र्यांचा खात्याशीच संबंध नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
२९ ऑगस्टच्या उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीचा विषय काय याची माहिती उपलब्ध नाही. कोविड काळात मविआचे मुख्यमंत्र्यांचे, सरकारचे कौतुक झाले. सध्या असंवैधानिक सरकारची विश्वासार्हता नाही. तुम्ही कुठल्याही पक्षाचे असाल पण वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत, महात्मा फुलें बाबत वादग्रस्त वक्तव्ये होऊन तुम्हाला चीड येत नाही का? आता पर्यंत राज्यपाल महाराष्ट्राची भूमिका नेत होते. आताही पदमुक्त का करत नाही. महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्याचे उद्योग, उद्या महाराष्ट्राचे तुकडे करायचे मनसुबे. अजूनही काही बोलत नाही राज्यपालांच्या बाबतीत, असे सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले.