महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ११४३ जागा भरण्यात आल्या. त्यापैकी १११ असे उमेदवार आहेत, ज्यांनी सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. या उमेदवारांना EWS प्रवर्गातून नियुक्तीपत्र देण्यास हायकोर्टाने स्थगिती दिली. याबाबत मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनीही राज्य सरकारकडे एक विनंती केली आहे. ‘उच्च न्यायालयाने निर्णय घेतलेला आहे की, ११४३ पैकी १११ विद्यार्थ्यांना तात्पुरत्या नियुक्त देऊ नका. उर्वरित विद्यार्थ्यांमध्ये सर्वच समाजाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत. तसेच मराठा समाजाचे सुद्धा आहेत. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, ज्या पद्धतीने आपण Super Numery चा कायदा केला होता, त्याच पद्धतीने आपण कायद्यात तरतूद करून या पात्र असणाऱ्या १११ विद्यार्थ्यांना समाविष्ट करावे व त्यांना न्याय द्यावा. कारण त्यांनी सर्वच प्रकारच्या परीक्षा देऊन अडचणींचा सामना करून यश संपादन केले आहे,’ असं विनोद पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाबाबत आबासाहेब पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला होता.