विलासराव देशमुखांनी सीमा प्रश्नी जे केलं तेच एकनाथ शिंदेंनी करावं, अजित पवारांचा सल्ला

पुणे: विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामतीमध्ये विविध मुद्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिला मुख्यमंत्री, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यानं निर्माण झालेला वाद आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न या मुद्यांवर भाष्य केलं. महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्रिपदावर विराजमान करायची असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. विरोधी पक्षनेते अजित पवार यांना यासंदर्भात विचारले त्यांनी देखील यावर त्यांची भूमिका स्पष्ट केली. १४५ आमदारांचा आकडा जो मिळवू शकतो तो मुख्यमंत्री होऊ शकतो. उद्या कोणाच्या मनात काय यावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे.उद्धव ठाकरे यांच्या मनात तसे आले असेल म्हणून त्यांनी तसे विधान केले असेल. उद्या महिला किंवा पुरुष कोणालाही मुख्यमंत्री करायचे असेल तर १४५ आकडा जो मिळवू शकतो तो मुख्यमंत्री होऊ शकतो, असे पवार म्हणाले.

सीमावादात महाराष्ट्राची बाजू हरीश साळवे यांनी मांडावी

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात सुरू असलेल्या वादावर देखील अजित पवार यांनी भूमिका मांडली. सध्या या दोन राज्यात सुरू असलेल्या प्रश्नावर न्यायालयीन लढाई लढण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्म्ई यांनी प्रख्यात विधीज्ञ रोहतगी यांच्याकडे सदर प्रकरण दिलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या वतीने आपली बाजू मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रख्यात विधीज्ञ हरीश साळवे यांच्याकडे केस द्यावी, असं अजित पवार म्हणाले. पूर्वी आघाडी सरकारच्या काळात या केसेस चालायच्या त्यावेळी विलासराव देशमुख यांनी साळवे यांच्याकडेच जबाबदारी दिली होती.साळवे हे नागपूरचे पुत्र असून त्यांना या प्रश्नांची चांगली जाण आहे, असेही पवार म्हणाले.

शाब्दिक फटकेबाजी टाळली, खासदार संजय राऊत आज थेट क्रिकेटच्या मैदानावर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा सर्व स्तरातून तीव्र शब्दात निषेध करण्यात आहे. वादग्रस्त वक्तव्य अनेकांकडून येत आहे. मात्र, त्याकडे राज्यकर्त्यांचे लक्ष नाही. तेवढ्यापुरते काहीतरी बोलून वेळ मारून नेत आहेत. वास्तविक यासंदर्भात महाराष्ट्रातील तमाम जनतेची भावना अतिशय तीव्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहेत. त्यांच्याबद्दल उठ सूट आक्षेपार्ह वक्तव्य केलेले महाराष्ट्रातील जनता खपवून घेणार नाही, अशी वक्तव्य जे कोणी करत आहेत. त्या व्यक्तींना ज्यांनी कोणी नेमले आहे,त्यांनी ताबडतोब यात लक्ष घालून योग्य ती कारवाई केली पाहिजे, असेही पवार म्हणाले.

आणखी एक आफताब! आधी प्रेम, मग गेम, प्रेयसीला संपवून जंगलात फेकलं

मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना पवार म्हणाले की, जे मुख्यमंत्री असतात. त्यांच्यासह 43 जणांचा मंत्रिमंडळ करता येते. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह 20 जण काम करत आहेत. त्यामुळे अजून त्यांना २३ लोकांना संधी देता येईल, असेही पवार म्हणाले.

VIDEO | एक बॉल सोडला, मग बॅट बदलली, नंतर मात्र ‘बोलंदाज’ संजय राऊत यांची तुफान फलंदाजी

Source link

ajit pawarAjit Pawar Newsmaharashtra karnataka border disputeMaharashtra politicsMarathi Breaking Newsudddhav thackeray newsUddhav Thackerayअजित पवारउद्धव ठाकरेएकनाथ शिंदे
Comments (0)
Add Comment