पैसे देऊन लग्न केलं, चार दिवसांनी भावाला भेटायचा बहाणा अन् दादर स्टेशनवरुन रफूचक्कर

जळगाव: शहरातील एका व्यापाऱ्याने अडीच लाख देऊन सिंधुदुर्ग येथील तरुणीशी लग्न केले होते. लग्नानंतर अवघ्या चार दिवसांतच ही तरुणी भावाला भेटायला जायचे सांगून मुंबई येथून रफुचक्कर झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीच्या नातेवाईकाकडे तसेच इतर ठिकाणी तरुणीचा शोध घेतला तसेच पैसे परत द्यावी अशी मागणी केली. मात्र, ना तरुणी परत आली ना पैसे परत मिळाले. त्यामुळे अखेर कंटाळलेल्या व्यापाऱ्याने तब्बल सात महिन्यानंतर सोमवारी शनिपेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील कांचननगर परिसरात शैलेंद्र किशनलाल सारस्वत (वय-४६) हे व्यावसायिक राहतात. त्यांचा २००७ मध्ये लग्न होवून घटस्फोट झाला होता. त्यानंतर २०२० मध्ये बेळगाव येथील एका व्यक्तीने सारस्वत यांच्या लग्नासाठी चांगले स्थळ पाहिले असल्याचे सांगितले. त्यानुसार जानेवारी २०२२ मध्ये त्यांनी सारस्वत त्यांच्या मोबाईलवर काही मुलींचे फोटो पाठविले.

हेही वाचा -हडपसरमध्ये खाजगी ट्रॅव्हल्स आणि पीएमटीची समोरासमोर धडक, गाड्यांची स्थिती पाहून धडकी भरेल…

त्यातील अर्पणा नावाच्या मुलीचा शैलेंद्र सारस्वत यांना फोटो आवडल्याने त्यांनी २१ एप्रिल २०२२ रोजी सोनी यांच्यासोबत बोलणी केली. तसेच मुलीला वडील नसून ती व्यवस्थित संसार करेल अशी हमी देखील दिली होती. परंतु लग्नासाठी त्यांना ३ लाख ४० हजार रुपये लागतील असे सांगितले. तडजोड करीत ही रक्कम २ लाख ६१ हजार रुपये एवढी ठरली आणि ती सारस्वत यांनी मान्य केले. त्यानुसार, आगाऊ रक्कम म्हणून शैलेंद्र सारस्वत यांनी २० हजार रुपये सोनी याच्या मुलीच्या बँक खात्यावर २३ एप्रिल रोजी ट्रान्सफर केले होते.

पैसे ट्रान्सर केल्यानंतर २५ एप्रिल रोजी शैलेंद्र सारस्वत हे त्यांची आई मैनाबाई, चुलत भाऊ राजेंद्र पृथ्वीराज सारस्वत, शाम ओझा आणि चुलत मावशी यांच्यासह खासगी वाहनाने कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील शास्त्रीनगर येथील सोनी यांच्या घरी गेले. याठिकाणी शैलेंद्र यांनी मुलीला पाहिले आणि पसंत केले. यावेळी तीने तिचे नाव अर्पना चंद्रकांत नाईक (वय-३३, रा. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) असे संगितले. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी त्यांनी वरमाळा टाकून विवाह केला होता. त्यानंतर २७ एप्रिल रोजी ते घरी परतल्यानंतर त्यांनी रितीरिवाजाप्रमाणे विवाह करीत संसार करु लागले.

हेही वाचा -आठ वर्षांचा तन्मय ४०० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला, १२ तासांनंतरही बचावकार्य सुरुच

लग्न होण्यापूर्वी सासरस्वत यांनी सोनी यांच्या मुलीच्या अकाऊंटवर वेळोवेळी पैसे टाकले होते आणि लग्नाच्या दिवशी ७ हजार ५०० रुपये रोख स्वरुपात असे एकूण २ लाख ६१ हजार रुपये त्यांना दिले होते.

भावाला भेटायचा बहाणा अन् नववधू मुंबई स्थानकावरुन रफूचक्कर

अर्पणा आणि शैलेंद्र यांचा संसार सुरु असताना ३० एप्रिलला विवहितेने तिचा भाऊ प्रशांत हा नालासोपारा येथे राहत असून त्याला भेटायला जाण्यासाठी हट्ट केला. त्यानुसार शैलेंद्र हे तिच्यासोबत २ मे रोजी दादरला पोहचले. त्याठिकाणी शैलेंद्र हे तिकीट काढत असताना त्यांची पत्नी अर्पणाने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी शैलेंद्र यांनी थांबविले असता, त्या विवाहितेने शैलेंद्रशी वाद घालीत माझ्या मागे येवू नको नाहीतर चपलेने मारीन अशी धमकी देत शिवीगाळ करीत तेथून निघून गेली. याप्रकरणी माटुंगा पोलिसात हरविल्याची तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.

मुलीच्या नातेवाईकांकडून उडवाउडवीची उत्तरे

या प्रकाराबाबत सारस्वत यांनी प्रकाश सोनी, माधूरी चव्हाण त्या विवाहितेचा मामा यांना कळविले असल्याने त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. तसेच, सोनी याने शैलेंद्र सारस्वत यांना धमकी देखील दिली. याप्रकरणी प्रकाश सोनी रा. बेळगाव याने विश्वास संपादन करुन त्यांच्याकडून २ लाख ६१ हजारांची रोकड लुबाडली तसेच अर्पणा चंद्रकांत नाईक रा. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग हिच्याशी लग्न लावून दिले.

परंतु ती संसार करता पळून गेली. पैसे परत मिळाले नाहीत आणि तरुणीही परत आले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची तक्रार शैलेंद्र सारस्वत यांनी सोमवारी शनिपेठ पोलिसात दिली. त्यावरुन तरुणीसह तिचे नातेवाईक असा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण हे करीत आहे.

Source link

bride ran away from mumbai bus stopbusinessman being cheated by bridebusinessman wife cheatedjalgaon newsmarriagenewly married woman ran awayजळगावबायको पळालीव्यापाऱ्याला घातला गंडा
Comments (0)
Add Comment