समृद्धी महामार्गावरून श्रेयवादाची लढाई रंगण्याची चिन्हे? मुख्यमंत्र्यांनी लावले ८०० बॅनर्स

Authored by आदित्य भवार | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 11 Dec 2022, 12:44 pm

Samruddhi Mahamarg inauguration in Nagpur | राज्याच्यादृष्टीने महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यानंतर श्रेयवादाचे राजकारण रंगायला सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी याचे श्रेय घेण्यासाठी जवळपास ८०० हून अधिक बॅनर्स समृध्दी महामार्गावर लावले आहेत. यावरुन अजित पवार यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत.

 

अजित पवार आणि एकनाथ शिंदे

हायलाइट्स:

  • आमच्या काळापासून समृद्धी महामार्गाचे काम सुरु आहे
  • समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाले
पुणे: राज्याच्या सर्वात महत्त्वाचा प्रकल्प असलेला समृध्दी महामार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. शिंदे-फडणवीस सरकार येण्यापूर्वीच या प्रकल्पाचे काम सुरू होते. या महामार्गाचे काम मार्गी लागावे यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले होते. यानंतर मात्र पंतप्रधानांनी स्वतः या समृध्दी महामार्गाचे उद्घाटन केले. मात्र नेमके याचे श्रेय कुणाचे याचा वाद आता समोर येऊ लागला आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याचे श्रेय घेण्यासाठी जवळपास ८०० हून अधिक बॅनर्स समृध्दी महामार्गावर लावले आहेत. त्यामुळे समृध्दी महामर्गाच्या उभारणीचे श्रेय कुणाचे, हा विषय आता चर्चेला येऊ लागला आहे.

यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले की, युती सरकार मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना रस्ते विकास महामंडळाचे मंत्री आणि अध्यक्ष हे एकनाथ शिंदे होते. त्या काळापासून त्यांचे काम सुरू होते. अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकरमध्ये असताना यात सरकारने कोणताही राजकारण न आणता काम होऊन दिले. आता पुन्हा ते सरकारमध्ये अस्तित्वात आले आहेत. याबाबत मला वाटतं नाही त्यांच्या मध्ये कुठे ही श्रेयवाद असेल. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यासाठी दोघे एकत्र दिल्लीमध्ये गेले होते. समृद्धी महामार्गवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी एकत्र पाहणी केली, यामध्ये उपमुख्यमंत्री गाडी चालवली,ती गाडी कोणाची होती ? मुख्यमंत्र्यांच्या गाडीच स्पीड पाहिलं,एका महामार्गवर एक स्पीड दुसऱ्या महामार्गवर वेगळं स्पीड असं कोण ठरवतं माहिती नाही. या स्पीड वरून कोणी कोर्टात जाऊ नये म्हणजे झाले, असे अजित पवार यांनी म्हटले.
PM Modi: समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनावेळी मोदींनी महाराष्ट्रातील जनतेचं मन जिंकलं, एकनाथ शिंदेंना खास वागणूक

मोदीजी फक्त तुमच्यामुळेच समृद्धी महामार्ग होऊ शकला: देवेंद्र फडणवीस

हिंदुहृदयस्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते व्हावे, ही आमची इच्छा होती. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर समृद्धी महामार्ग कधी होऊच शकला नसता. तुम्ही ताकद दिली म्हणून हा महामार्ग प्रत्यक्षात आला. समृद्धी महामार्ग उभारायचे ठरवले तेव्हा एक व्यक्ती पहिल्या दिवसापासून माझ्यावर विश्वास ठेवून काम करत होता. ती व्यक्ती म्हणजे रस्ते विकास महामंडळाचे तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे. आम्ही सगळ्यांनी ही संकल्पना सर्वांसमोर मांडली. समृद्धी महामार्ग उभारण्यासाठी खूप निधी लागणार होता. पण तेवढे पैसे देण्यासाठी कोणतीही बँक तयार नव्हती. तेव्हा आम्ही सिडको आणि एमएमआरडीए यांना विदर्भातील प्रकल्पासाठी पैसे लावण्यास राजी केले. आम्ही केवळ ९ महिन्यात ७०० किलोमीटर जमीन अधिग्रहीत केली. या सगळ्यात एकनाथ शिंदे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

CM Eknath Shindenagpur local newsPM Narendra Modipm narendra modi in nagpursamruddhi mahamarg inaugurationपंतप्रधान नरेंद्र मोदीसमृद्धी महामार्ग उद्घाटन
Comments (0)
Add Comment