पहाटेच्या अंधारात होत्याचं नव्हतं! मॉर्निंग वॉक करणाऱ्या चौघांना कारने चिरडलं

हिंगोली : पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास मॉर्निंग वॉक करणाऱ्या मुलांना कारने जोरदार धडक दिली. यामध्ये एका १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात येत असलेल्या वारंगाफाटा ते हदगांव मार्गांवर भुवनेश्वर कुर्तडी येथे आज अपघात झाला.

हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसापासून सातत्याने रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावर आळा घालण्यासाठी काहीतरी उपाययोजना राबवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वारंगा फाटा ते हदगांव या मार्गावर आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास कळमनुरी तालुक्यातील कुर्तडी येथील आर्यन राजू चौरे (वय १४ वर्ष), रितेश धोंडिबाराव नरवाडे (वय १४ वर्ष), कोमल अशोक हरकरे ( वय १८ वर्ष) आणि साक्षी मोतीपुरी पुरी (वय १८ वर्ष) हे चौघे रोजच्या प्रमाणे मॉर्निंग वॉक करत होते.

अचानक हदगावकडून वारंग्याकडे जाणाऱ्या भरधाव कारने त्यांना उडवले. यामध्ये आर्यन राजू चौरे याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर तिघे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच बिट जमादार शेख बाबर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारसाठी रवाना केले.

हेही वाचा : रुम बूक केली, मृत्यूला एकत्र कवटाळण्याचा युगुलाचा प्लॅन, ‘त्या’ क्षणी प्रेयसी मागे हटली, पण…

दरम्यान, कोमल अशोक हरकरे ही तरुणी गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. अपघातानंतर कार न थांबता तेथून पुढे गेली. पोलीस कारचा शोध घेत आहेत. या मार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. वळण रस्ता किंवा अपघात स्थळ असे फलक महामार्गावर लावलेले नाहीत असे ग्रामस्थ श्याम नारवाडे यांनी सांगितले.

हेही वाचा : बॉडी मसाज सर्च करताना ‘ती’ वेबसाईट उघडली, समोर बहिणीचा फोटो …

Source link

Car accidenthingoli accidenthingoli car accidentmaharashtra accident newsmorning walkकार अपघातमॉर्निंग वॉकहिंगोली कार अपघात
Comments (0)
Add Comment