१८ डिसेंबरला जे मतदान झालं यावेळेस ईव्हीएम मशीनवरील बटनवर फेविक्विक टाकल्याचा प्रकार घडला होता.त्यामुळे लिंबागणेश च्या मतदानाची मतमोजणी झाली नव्हती. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग क्रमांक २ मध्ये सरपंच आणि सदस्य पदासाठी फेरमतदान घेण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी लिंबागणेश ग्रामपंचायत निवडणुकीत फेर मतदान घेण्यात आले.यावेळी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत शांततेत प्रक्रिया पार पडली. मतदानानंतर सायंकाळी बीड च्या शासकीय आय टी आय येथे मतमोजणी झाली.
इमरान खानच्या घटस्फोटित पत्नीचं तिसरं लग्न, रेहम खानच्या पतीच्या वयातील अंतर वाचून थक्क व्हाल
लिंबागणेश ग्रामपंचायत निवडणुकीत माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर यांचे समर्थक आणि सरपंच पदाचे उमेदवार बाळासाहेब जाधव यांना ७२७ मते घेऊन विजयी झाले. या निकालाने लिंबागणेश गाव जयदत्त क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. मात्र, या निवडणुकीत आणि मतदानादरम्यान या ग्रामपंचायत मध्ये एक वेगळं चित्र देखील पाहायला मिळाला तो म्हणजे भाजप देखील लिंबागणेश मध्ये एकच पक्ष दोन गटात समोर होता एकीकडे भाजप शहराध्यक्ष स्वप्निल गलधर तर दुसऱ्या बाजूने जिल्हाध्यक्ष भाजप राजेंद्र मस्के यांच्या गटानं स्वंतत्रपणे निवडणूक लढवली. त्यामुळं या ग्रामपंचायत निवडणुकीकडे भाजप विरुद्ध भाजप असेच पाहिला मिळत होतं. मात्र, त्यामध्ये अचानक जयदत्त क्षीरसागर गटातील उमेदवाराने या फेर निवडणुकीमध्ये बाजी मारल्याने लिंबागणेश ग्रामपंचायत पुन्हा एकदा वर्चस्व जयदत्त क्षीरसागर यांच्याच गटाकडे गेली आहे. जयदत्त क्षीरसागर चौसाळा सर्कल मधील अनेक गावात आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे.
आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणाऱ्या रिदा रशीद अडचणीत, महिलेची पोलिसात तक्रार
पंकजा मुंडे यांनी देखील जिल्हाभरातील अनेक ग्रामपंचायतीवर आपलं वर्चस्व दाखवलं असल्याचं माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं, मात्र, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांना या फेर मतदान झालेल्या लिंबा गणेश गावात हार पत्करावी लागली आहे. राजेंद्र म्हस्के यांच्याकडून लिंबागणेशमध्ये विविध विकासकामं करण्यात आली होती.
IPL 2023 Auction मध्ये भारताच्या कोणत्या खेळाडूवर सर्वाधिक बोली लागली, जाणून घ्या…