लष्करी मदत मागवली
जिंदाल कंपनीला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनानं लष्करी मदत मागवली आहे. फोम भरलेल्या गाड्या, फॉरेन्सिक तज्ञ पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. ठाणे जिल्ह्यातून अग्निशमन दलाची मदत मागवण्यात आलेली आहे. कंपनीतील डिझेल टॅंकला आग लागल्याचं देखील समोर आलं आहे. केमिकल कंपनी असल्याने आग आटोक्यात आणण्यास उशीर होत असल्याची माहिती आहे.
जखमींची नावं आणि वय
राकेश सिंग
गणेश यादव ४०
हिरामण यादव ४९
पवित्रा मोहिती २२
कुमार सजीव २८
कैलास कुमार सिंग ४०
ज्ञानेश्वर यादव ३५
श्रध्दा गोस्वामी २६
याचिका कटियार ३०
पूजा सिंग २५
अभू तालीम २९
मनोज पाठक ३३
लखनसिंग ४९
सूर्यकुमार राऊत ४१
गजेंद्रसिंग पाल
चार ते पाच जण गंभीर जखमी
इगतपुरी येथील जिंदाल कंपनीत लागलेल्या आग प्रकरणात आत्तापर्यंत 14 जखमी तर चार ते पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना दिली आहे. तर कंपनीमध्ये अजून तीन ते चार जण अडकल्याच देखील त्यांनी यावेळी सांगितला आहे अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत केमिकल कंपनी असल्याने आग विझवण्यात विलंब होत आहे . अशी देखील माहिती बीजी शेखर यांनी दिली आहे. जखमींना नाशिक मधील वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात उपचार करतात दाखल करण्यात आले आहे.
नाशिकमध्ये जिंदाल कंपनीत भीषण स्फोट, आगीत काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती
आग कशी लागली?
नाशिकजवळ असलेल्या इगतपुरीतील मुंढेगावजवळ जिंदाल समूहाची कंपनी आहे. जिंदालच्या या कंपनीत आज सकाळच्या सुमारास मोठा स्फोट झाला. जिंदाल समूहाच्या पॉलिफिल्मची निर्मिती करणाऱ्या या कंपनीत आधी स्फोट झाला आणि या स्फोटमुळे आग लागली. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळी दाखल झाले आहेत.
जे यायचे नाहीत तो खासदार मीच, शरद पवारांनी सांगितला भन्नाट किस्सा
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ असलेल्या जिंदाल कंपनीला लागलेल्या भीषण आगीत कंपनीतील काही कामगार अडकले आहेत. अग्निशमन दलाचे बचावकार्य आणि शोधकार्य अद्याप सुरू आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये बोलताना दिली.
नाशिकच्या आग प्रकरणात एसडीआरएफ आणि एनडीआरएफ यंत्रणेची मदत घेतली जात आहे. जखमी असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. घडलेली घटना दुर्दैवी आहे. पोलीस सर्व बाजूने तपास करत आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.
किरीट सोमय्यांनी रश्मी ठाकरेंच्या १९ बंगल्यांचं प्रकरण पुन्हा उकरून काढलं, पोलीस कारवाईसाठी पहिलं पाऊल