हायवेवर ३ वाहनांचा विचित्र अपघात; २ तरुणी जागीच ठार, लहान मुलासह तिघांवर रुग्णालयात उपचार

ठाणे : मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर शहापूरजवळील कुमार गार्डन हॉलजवळ रविवारी संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात शहापुरातील कळंभे येथील दोन तरुणींचा जागीच मृत्यू झाला असून इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या टोयोटो कार, रिक्षा आणि स्कुटी अशा तीन वाहनांना विचित्र अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की स्कुटी आणि रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. तसंच सहाना अन्सारी आणि अश्विनी भास्कर गोळे (वय २१) यांचा जागीच मृत्यू झाला असून लहान मुलासह अन्य दोन जण जखमी झाले आहेत. जखमींवर शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुलगी म्हणाली रात्री दहापर्यंत येते, पण… तरुणीला फरफटत नेणाऱ्या कारचा सीसीटीव्ही व्हिडीओ

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आसनगाव रेल्वे ब्रीजचे काम सुरू असताना ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे कुमार गार्डन हॉलजवळ सतत वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे काही वाहनचालक उलट्या दिशेने वाहने चालवतात. त्यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे, असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

काही दिवसांपूर्वीही अपघाताची घटना

याच महामार्गावर गंगा देवस्थानजवळच्या पुलावर तीन वाहनांचा काही दिवसांपूर्वीही अपघात झाला होता. या अपघातात दोन जण जखमी झाले होते. त्यावेळी भरधाव कंटेनर पलटी झाला होता. त्यामुळे मागून येणाऱ्या कंटेनरने त्याला धडक दिली आणि नंतर आयशर टेम्पोही येऊन धडकला होता.

Source link

girl death in accidentshapur accident newsthane news todayठाणे ताज्या बातम्यामुंबई नाशिक हायवेशहापूर अपघात बातमी
Comments (0)
Add Comment