छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक? अमोल कोल्हे म्हणाले, तर्कशुद्ध विचार केला तर…

मुंबई : छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूरमध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केलं. यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. अजित पवार यांच्या वक्तव्यावरून भाजपकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं आणि निषेध केला जात आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी व्हिडिओ जारी करत या मुद्द्यावर भूमिका मांडली आहे.

काय म्हणाले अमोल कोल्हे?

छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक? या मुद्द्यावर मी बोलायला हवं आणि भाष्य करायला हवं, अशी मागणी अनेकांनी केली. तर या वादात पडू नये, असा सल्लाही काही जणांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो तर्कशुद्ध आणि खरा इतिहास आहे, जो मालिकेद्वारे असेल, शिवपुत्र संभाजी महानाट्याद्वारे असेल ते मांडण्याचं काम तुम्ही करताय? यामुळे हे करत असताना यावर मी बोलण्याची गरज आहे का? असे प्रश्नही उपस्थित झाले. पण हा व्हिडिओ पूर्णपणे अराजकीय आहे. इतिहासाकडे केवळ अभिनिवेशातून बघण्यापेक्षा तर्कशुद्ध बुद्धीने पाहण्याची गरज आहे. इतिहासातून नेमक्या काय प्रेरणा मिळतात हे पाहणं गरजेचं आहे, असं अमोल कोल्हे यांनी व्हिडिओच्या सुरवातीला म्हटलं आहे.

माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल विधान केलं आणि छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर की स्वराज्यरक्षक? ही चर्चा सुरू झाली. त्यासाठी हा व्हिडिओ आहे. खूप तर्क संगत पद्धतीने मला जे उमगलं, मी इतिहास संशोधक नाही आणि इतिहासाचा गाढा अभ्यासक नाही. पण स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका करत असताना जे मला जाणवलं, शिवपुत्र संभाजी हे महानाट्य करत असताना, शंभूराजे हे नाटक करत असताना गेली १३-१४ वर्षे सातत्याने काम करत असताना आणि तर्कशुद्ध पद्धतीने विचार करत असताना जे जे जाणवलं ते सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय, असं अमोल कोल्हे म्हणाले.

इतिहासाचा तर्कशुद्ध बुद्धीने विचार करायला हवा. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर ठरतात का? या अँगल आधी विचार करूया. चिकित्सकपद्धतीने पाहूया. समकालीन पुरावे बघूया. औरंगजेबाविरोधात संभाजी महाराजांची सत्तावर्चस्वाची लढाई होती की केवळ धर्मयुद्ध होतं? असा प्रश्न उपस्थित होतो. तर याच औरंगजेब बादशहाने आदिलशाही निस्तनाबूत केली, कुतूबशाही संपवली, याच औरंगजेब बादशहाने सख्ख्या बापाला हालहाल करून मारलं. सख्ख्या भावांची याने कत्तल केली. त्यामुळे हे धर्मयुद्ध असण्यापेक्षा ही सत्ता वर्चस्वाची लढाई होती. आणि काबूल ते बंगालपर्यंत सत्ता असणाऱ्या औरंगजेबाला ८ ते ९ वर्षे छत्रपती संभाजी महाराजांनी अक्षरशः या दख्खनमध्ये फरफटवलं होतं. त्यामुळे हे धर्मयुद्ध होत नाही, असं अमोल कोल्हे म्हणाले. अमोल कोल्हे यांनी या व्हिडिओत चार इतिहासकारांची नाव सांगत त्यांनी लिहिलेल्या पुराव्यांचा उल्लेख केला.

मुंबईतला माजी नगरसेवकही शिंदे गटाच्या वाटेवर? युवासेनेच्या बैठकीला गैरहजर, व्हॉट्सॲप ग्रुपमधूनही लेफ्ट

छत्रपती संभाजी महाराज हे बदफैली होते. पण त्यांची प्रतिमा ही मलिन करण्यात आली. पण त्यांनी धर्मासाठी बलिदान दिलं गेलं हे काही लेखनातून मांडण्यात आलं. ही संकल्पना येते तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचे शेवटचे जे दिवस होते, म्हणजे त्यांना कैद केल्यानंतरच्या असिम बलिदानापर्यंतचा जो काळ होता, एवढ्या पुरतचं ते मर्यादित ठेवतं, जर छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर ही बिरुदावली लावली तर, असं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं. धर्मवीर म्हणण्यापेक्षा स्वराज्यरक्षक ही बिरुदावली खूप जास्त व्यापक ठरते. छत्रपती संभाजी महाराजांनी आवघ्या ९व्या वर्षापासून स्वराज्यसाठी त्याग केला. मिर्झाराजे जयसिंग याच्या गोटात ओलिस राहिले. त्यानंतर मथुरेतही राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या देहावसानानंतर एकाचवेळी पाच पाच आघाड्यांवर पंजेफाड करत छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य राखलं. त्यामुळे केवळ धर्म म्हणण्यापेक्षा तत्कालीन इतिहासाचा तर्कशुद्धपद्धतीने विचार केला तर देव देश आणि धर्म या तिन्ही गोष्टींचा जो परिपाक होता तो म्हणजे स्वराज्य होतं, असं डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.

शिवरायांचा अपमान करणारे अण्णाजी पंत राजभवनात बसलेत अन् भाजपवाले अजितदादांना

Source link

ajit pawarAmol Kolheamol kolhe on chhatrapati sambhaji maharajchhatrapati sambhaji maharajchhatrapati sambhaji maharaj dharmaveermumbai newsswarajya rakshak
Comments (0)
Add Comment