औरंगाबाद : शीर धडावेगळं असलेला मृतदेह, ‘त्या’ हत्येचा अखेर उलगडा; धक्कादायक कारण समोर

औरंगाबाद : वाळूज औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेल्या कंपनीत झालेल्या तरुणाच्या हत्येचं गूढ उकललं आहे. दारूची पार्टी करत असताना तिघांमध्ये वाद झाला. मात्र, या वादाचा त्यातील दोघांनी मनात राग धरून मित्राला मद्यधुंद करून दुचाकीवरून निर्जनस्थळी नेत दगडाने धडापासून शिर वेगळे केले. ते दोघे एवढ्यावरच न थांबता मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी दोघांनी मृतदेहाचा चेहरा जाळला. त्यानंतर खिशातील रोख रक्कम घेऊन ते दोघं दुचाकी घेऊन फरार झाले.

मात्र, पोलिसांनी कुठलाही पुरावा नसताना तपास सुरू करत मृताची ओळख पटवत मुंबईत पळालेल्या दोघांच्या मुसक्या आवळल्या. अजय व्यंकट नीलवरन (वय २१ रा. मंगळूर ता. मानवत, जि.परभणी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर निखिल भाऊसाहेब गरड (वय १९ रा.जळगाव ता.पैठण) प्रतीक सत्यवान शिंदे (वय २१ रा.हिवरे, ता. कोरगाव, जि.सातारा) अशी हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींची नावे आहेत.

दाऊद कनेक्शनमुळे जेलमध्ये गेले होते ब्रजभूषण, अटलजींनी करून दिली होती सावकरांची आठवण

मिळालेल्या माहितीनुसार, १४ जानेवारी रोजी एका मित्राचा वाढदिवस असल्याने सहा मित्र वाळूज औद्योगिक परिसरात एकत्र आले होते. त्यांनी सकाळ पासूनच दारू पिण्यास सुरू केली. दारू प्राशन केल्यानंतर मित्राचा केक कापत वाढदिवस साजरा केला. दरम्यान, मृत अजयने दोन्ही मित्रांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मात्र, इतर मित्रांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. यानंतर पुन्हा त्या सहा मित्रांनी दारू पिली. यानंतर संध्याकाळी त्यातील तिघं मित्र घरी निघून गेले. मात्र, आरोपी निखिल आणि प्रतीक या दोघांच्या मनात शिवी दिल्याचा राग होता.

अगोदरच दारूच्या नशेत असलेल्या अजयला दोन्ही आरोपींनी पुन्हा दारू खरेदी करत अजयला पाजली. त्यानंतर अजयची शुद्ध हरपली. दोघांनी त्याला दुचाकीवर बसवत बंद पडलेल्या फतेजा फॉर्जिंग कंपनीच्या आवारात घेऊन गेले. तिथे मद्यधुंद अजयच्या मानेखाली दगड ठेवला व परिसरातून एक धारदार दगड आणून अजयच्या गळ्यावर एकानंतर एक वार केले. काही क्षणात अजयचे शिर धडावेगळे झाले. या नंतर दोघांनी त्याच्या खिशात असलेली रोख सहा हजार काढून घेत अजयचीच दुचाकी घेऊन फरार झाले. त्यानंतर मुंबई येथे जाऊन खासगी काम करू लागले. मात्र, पोलिसांनी अत्यंत किचकट असलेला ब्लाइंड मर्डरच्या केसचा कसोशीने तपास करत उकल केली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलीस या प्रकरणाचा अजून अधिक तपास करत आहेत.

बाळासाहेबांच्या तैलचित्राची पहिली झलक ‘मटा’वर; अनावरणाला ठाकरेंनी एकत्र यावं, चित्रकारांची अपेक्षा
साहेब त्या दिवसांपासून झोप नाही

निखिल आणि प्रतीक या दोघांनी मित्र अजयची निर्घृणपणे हत्या केली. मात्र, त्या घटनेनंतर ते खूपच घाबरले होते. पोलिसांनी जेंव्हा त्यांना पकडले तेव्हा त्यांनी पोलिसांना माहिती देत “साहेब जेव्हापासून आम्ही ते कांड केले तेव्हापासून आम्हाला झोप नाही”, अशी कबूली त्यांनी दिली.

लहान मुलांच्या संशयाने पोलिसांनी दोघांना शोधले

अर्ध जळलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. मात्र, अजय परजिल्ह्यातील असल्याने तपासात अनेक अडथळे येत होते. अखेर काही लहान मुले यांनी फोटो ओळखला व इतर दोघे आरोपींबाबत संशय व्यक्त केला. त्यानंतर घटनेतील एका नंतर एक पान उघडत गेलं आणि पोलिसांनी थेट मुंबई गाठत दोघांना अटक केली.

मृताची दुचाकी नगरला विकली

निखिल आणि प्रतीक यांनी अजयची हत्या केल्यानंतर त्याच्याच दुचाकीने अहमदनगरच्या दिशेने पळाले होते. नगरला गेल्यावर आपण पकडले जाऊ या भीतीने त्यांनी अजयची दुचाकी नगरमध्ये विकली असल्याचं समोर येत आहे. ती दुचाकी कुणाला विकली? विकत घेणाऱ्या व्यक्तीचं घटनेशी काही संबंध आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

पाकिस्तानच्या हाती आहे जगातील सर्वात मोठा ‘खजिना’; एका झटक्यात बदलू शकते नशीब

Source link

Aurangabad crime newsaurangabad marathi newsaurangabad waluj midc murder caseaurangabad waluj murder caseऔरंगाबाद क्राईम बातम्याऔरंगाबाद मराठी बातम्याऔरंगाबाद वाळूज एमआयडीसी चटई कंपनी आगऔरंगाबाद वाळूज मर्डर केस
Comments (0)
Add Comment