ठाण्यातील टेंभी नाका येथील प्रसिद्ध जैन मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित होते. यावेळी जैन समाजाकडून पुष्प वर्षाव करून राज ठाकरे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. राज ठाकरे यांनी मंदिरात आरतीही केली. यावेळी मंदिरातील धर्मगुरू महंत यांनी राज ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब ठाकरेंचे अखंड भारताचे स्वप्न साकार करण्याची इच्छा व्यक्त केली.
जैन धर्मगुरूंनी प्रार्थना करून राज ठाकरे यांचे स्वागत केले. राज ठाकरे यांच्याकडे आमची खूप मोठी अपेक्षा आहे. बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्न पूर्ण करण्याची अपेक्षा आहे. मी महाराष्ट्राबद्दल किंवा भारताबद्दल बोलत नसून अखंड भारत हे बाळासाहेबांचे स्वप्न आहे. तेच आमचेही स्वप्न आहे. काश्मीर आर्ध आले आहे, ते अजून बाकी आहे. आम्हाला पूर्ण काश्मीर पाहिजे. सिंध आणि पाकिस्तान पण पाहिजे. हे आमच्या बाळासाहेबांचे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार नाही झाले तर काय राहील. त्यामुळे आमचे अखंड भारताचे स्वप्न आहे ते पूर्ण करा, अशी इच्छा धर्म गुरू यांनी राज ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली.
जितेंद्र आव्हाडांचे निकटवर्तीय शिंदे गटाच्या वाटेवर?; मुंब्र्यातील ‘त्या’ पोस्टरमुळं चर्चेला उधाण
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मंदिरात उपस्थिती लावून पूजा केली. तेथून बाहेर निघाल्यानंतर राज ठाकरे यांनी ठाण्यात तलावपाळी परिसराला भेट दिली. त्यानंतर राज ठाकरे यांनी ठाण्यातील विश्राम गृह येथे उपस्थिती लावून पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर राज ठाकरे हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
Thane : महापौर बंगल्यात निवडणूक बैठका? शिंदे गटाकडून आचारसंहिता भंगाचा राष्ट्रवादीचा