अयोध्येतील राम सीतेच्या मुर्तीसाठी नेपाळ वरून मागवलाय शालिग्राम, ‘हे’ आहे कारण आणि धार्मिक महत्व

अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात स्थापित केल्या जाणार्‍या भगवान राम आणि सीतेच्या मूर्ती नेपाळच्या गंडकी नदीत सापडलेल्या विशेष दगडांमध्ये कोरल्या जाणार आहेत. या कामासाठी नेपाळच्या मुक्तिनाथ भागातील दोन मोठे दगड बुधवारी अयोध्येला पाठवण्यात आले. या खडकांना शालिग्राम असेही म्हणतात. त्यांना भगवान विष्णूचे प्रतिक मानले जाते. पुढील वर्षी जानेवारीमध्ये मकरसंक्रांतीपर्यंत मूर्ती तयार होण्याची शक्यता आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार, सीता नेपाळच्या राजा जनकाची कन्या होती आणि तिचा विवाह अयोध्येच्या भगवान रामाशी झाला होता. नेपाळमधील जनकपूर येथे शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी राम आणि सीता यांचा विवाह रामनवमीला रामाचा जन्मोत्सव साजरा करून भाविक साजरे करतात.

हिंदू धर्मात शालिग्रामला विशेष महत्त्व आहे. हा दगड एक प्रकारचा जीवाश्म दगड आहे, तो मुक्तिनाथ, नेपाळमध्ये काली गंडकी नदीच्या काठावर आढळतो. ज्या घरात शालिग्रामचा दगड असेल त्या घरात सुख-शांती नांदते आणि परस्पर प्रेम टिकून राहते. यासोबतच देवी लक्ष्मीची कृपाही कायम राहते. शालिग्रामचे असणे लक्ष्मीला आकर्षित करते असे सांगितले जाते.

शालिग्रामचे प्रकार

असे म्हटले जाते की, शालिग्रामचे ३३ प्रकार आहेत, त्यापैकी २४ प्रकार भगवान विष्णूच्या २४ अवतारांशी संबंधित आहेत. हे सर्व २४ शालिग्राम वर्षातील २४ एकादशीच्या व्रताशी संबंधित आहेत. शालिग्राम दगडाला सालग्राम असेही म्हणतात. पुराणानुसार, शिवलिंग आणि शालिग्राम हे भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्या देवता म्हणून पूजले जातात. हिंदू धर्मात मूर्तीपूजेची प्रथा आहे, परंतु या मूर्तींपूर्वी ब्रह्मदेवाची शंख, भगवान विष्णूची शालिग्राम आणि महादेवाची शिवलिंगाच्या रूपात पूजा केली जात होती.

असे बनले भगवान विष्णू शालिग्राम

जालंदर असुराची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता होती. तिच्या पुण्यप्रभावामुळे तो देवांनाही अजिंक्य झाला होता. वृंदेला भ्रष्ट केल्याशिवाय जालंदरचा पराभव शक्य नाही, हे देवतांना माहिती होते. म्हणून श्रीविष्णूंनी जालंदराच्या अनुपस्थितीत त्याचेच रूप धारण करून, त्याच्या महाली जाऊन वृंदेचे सत्व हरण केले. सती वृंदा हिच पुढे तुळशीरूपाने प्रगट झाली. परंतु देहत्याग करताना तिने श्रीविष्णूंना दगड (शाळिग्राम) होण्याचा शाप दिला. विष्णूनेही तिला तुळशीचे रोप होण्याचा प्रतिशाप दिला. वृंदेच्या पतिव्रत्यामुळे संतुष्ट होऊन विष्णूने तिला वरही दिला की, तुळशीची पूजा केली जाईल आणि या घटनेची स्मृती म्हणून शालिग्रामाशी, म्हणजेच विष्णूशी, तुळशीचे लग्न लावले जाईल. यामुळे विष्णूंना शालिग्राम स्वरूप मानले जाते आणि पूजले जाते.

यामुळे गंडकी नदीत सापडतात शालिग्राम

वृंदा देवीच्या शापातून मुक्त झाल्यावर भगवान विष्णूनेही वृंदा देवीला वरदान दिले होते की तू सदैव गंडकी नदीच्या रूपाने पृथ्वीवर वाहत राहशील. तुझे एक नाव नारायणी असेल. मी तुझ्या जलप्रवाहात शालिग्राम शिलेच्या रूपात निवास करीन कारण तू मला सदैव प्रिय आहेस. भगवान विष्णूने दिलेल्या या वरदानामुळे शालिग्राम शिला गंडकी नदीलाच मिळते.

अशीही मान्यता

विष्णूने नवग्रह निर्माण केले आणि माणसाचे बरे वाईट करण्याचे काम त्यांच्यावर सोपवले. शनी या पापग्रहाला हे सामर्थ्य मिळताच तो ब्रह्मदेवाच्या राशीलाच गेला. ब्रह्मदेवाने त्याला विष्णूकडे पाठविले. विष्णू घाबरला आणि त्याने शनिला ‘उद्या ये’ असे सांगितले. दुसर्‍या दिवशी शनी गेल्यावर विष्णू जागेवर नाही असे समजले. शोध घेतला असता विष्णू गंडकी शीळेचा पर्वत होऊन गेल्याचे समजले. शनिने वज्रकीट नावाच्या किड्याचे रुप घेतले आणि पर्वताच्या पोटात शिरून पोखरू लागला. विष्णूला हे पोखरणे सहन होईना त्याच्या अंगातून घामाच्या धारा बाहेर आल्या. त्याच पुढे कृष्ण गंडकी व श्‍वेत गंडकी म्हणून दोन नद्या झाल्या. बारा वर्षानंतर विष्णू शनिच्या त्रासातून मुक्त झाला. त्याने निजरुप घेतले आणि आपले प्रतीक म्हणून गंडकीतल्या शालिग्रामांची लोकांनी पूजा करावी असे सांगितले.

Source link

Ayodhyaayodhya ram sita statueram sitaShaligram Stone ImportanceShaligram Stone Significanceअयोध्या राम मंदिरअयोध्येतील राम सीता मुर्तीराम सीताशालिग्रामचे धार्मिक महत्व
Comments (0)
Add Comment