पालघर : भाईंदर येथे काल गुरुवारी रात्री उशिरा भरधाव ट्रकच्या चालकाने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून, या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. मीरा रोड येथील रस्साज मल्टिप्लेक्समध्ये नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ चित्रपटाचा नाईट शो पाहून हे दोघे तरुण घरी परतत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोल्डन नेस्ट सर्कल येथे सकाळी १२.३०च्या सुमारास हा अपघात झाला.
अबरार अली मनिहार (वय २२) आणि त्याचा मित्र तुफैल शमीम शाह (वय २६) दोघेही आझाद नगर येथील रहिवासी आहेत. भाईंदर (पूर्व) मीरा रोड येथील रस्साज मल्टिप्लेक्समध्ये नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ चित्रपटाचा नाईट शो पाहून दुचाकीवरून ते घरी परतत होते.
अबरार अली मनिहार (वय २२) आणि त्याचा मित्र तुफैल शमीम शाह (वय २६) दोघेही आझाद नगर येथील रहिवासी आहेत. भाईंदर (पूर्व) मीरा रोड येथील रस्साज मल्टिप्लेक्समध्ये नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ चित्रपटाचा नाईट शो पाहून दुचाकीवरून ते घरी परतत होते.
टॉस झाल्यावर भारतीय संघाला मिळाली गुड न्यूज, हार्दिक पंड्याने सांगितलं विजयाचं मुख्य कारण
काशिमिराच्या दिशेने ट्रक फाटक रस्त्याच्या दिशेने निघाला होता. त्या दोघं तरुणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली होती. त्या दोघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई यांनी त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली, “आम्ही उस्मान नावाच्या ४५ वर्षीय ट्रक चालकाला अटक केली आहे आणि त्याच्यावर निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याबद्दल कलम ३०४ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे”, असं देसाई यांनी त्यावेळी सांगितलं. दरम्यान, या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
मंत्रिपद गेलं न् कौतुक करणारी पाखरंही उडून गेली, सदाभाऊ खोत यांची व्यथा