मुंबईच्या व्यक्तीने इगतपुरीत संपवलं आयुष्य; हॉटेलच्या रुममध्येच…

नाशिक: जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात मुंबई येथील एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने इगतपुरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, इगतपुरी येथील अप्रभाव मानस प्रोजेक्ट हॉटेल विवांत येथे चिराग विनोद राय वरैया ( अंदाजे वय ४५ रा.मुलुंड मुंबई ) यांनी हॉटेलच्या रूममध्येच आयुष्य संपवले आहे. यावेळी पूजा करण्यासाठी लागणाऱ्या सोवळ्याचा कपडा फॅनला बांधून आणि गळ्याभोवती आवळून गळफास घेत आत्महत्या केली आहे.

याप्रकरणी हॉटेल मॅनेजर आनंद गणपतराव शिंदे वय ४२ खालची पेठ इगतपुरी यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली मृतदेहाचा पंचनामा केला असून इगतपुरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

वाचाः मुंबईकरांचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास ८ तासांचा उशीर; ‘या’ वेळेत पूर्वपदावर येणार पाणीपुरवठा

मुंबई येथील राहणाऱ्या व्यक्तींने नाशिकच्या इगतपुरी येथे येऊन हॉटेलच्या रूममध्ये आत्महत्या केल्याने अनेक उलट सुलट चर्चा रंगू लागल्या होत्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नसून प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर एस जाधव एस एस लोहोरे करीत आहेत.

वाचाः बायको हरवल्याची तक्रार घेऊन गेला अन् अडकला; पोलिसांनी पतीलाच ठोकल्या बेड्या

नाशिक शहरासह जिल्हाभरात आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून गेल्या दोन दिवसात विविध कारणातून सात जणांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.

वाचाः पठ्ठ्यानं करुन दाखवलं! शेतकरी कुटुंबातील मुलगा झाला RTO इन्स्पेक्टर

Source link

nashik crime newsNashik newsnashik suicide newsनाशिक आत्महत्या प्रकरणमुंबईच्या व्यक्तीची नाशिकमध्ये आत्महत्या
Comments (0)
Add Comment