नाशिकः अंधश्रद्धेचे भूत! भुताटकीचा आरोप, आठ कुटुंबांनी स्वतःच्या घराची मोडतोड करत सोडलं गाव

नाशिकः पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्यात आज ही अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात असलेल्या घोटी येथे भुताटकीच्या आरोपामुळे आठ कुटुंबांना आपले राहत्या घराची मोडतोड करत गाव सोडावे लागले आहे. या अंधश्रद्धेच्या प्रकाराने इगतपुरी तालुका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (Nashik Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील भोरवाडी राहत असलेल्या एका कुटुंबातील आजारी असणाऱ्या बालकाचा मृत्यू झाला होता. भुताटकी केल्यामुळे या बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत या परिवारांने गावात आठ कुटुंबांचा छळ सुरू केला हा वाद विकोपाला गेल्यानंतर याबाबत घोटी पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी संबंधितांना समजावून सांगत त्यांचा गैरसमज दूर करण्याचा देखील प्रयत्न केला मात्र त्यानंतरही संबंधित परिवारांना या आठ कुटुंबांचा छळ सुरूच होता.

वाचाः Pervez Musharraf Passed Away: पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन

पोलीस तक्रार देऊनही हा प्रकार सातत्याने घडत असल्याने या वादास कंटाळून या आठ कुटुंबांनी अखेर गाव सोडण्याचा निर्णय घेतला. आपल्या घराची मोडतोड करत पाठीवर संसार घेऊन दुसरीकडे स्थलांतराचा निर्णय घेतला.

वाचाः पोळ्या लाटण्याच्या बहाण्याने ३ महिलांना कारमध्ये बसवलं, अज्ञात ठिकाणी नेलं अन् घडलं भयंकर

या प्रकारामुळे इगतपुरी तालुक्यात खळबळ उडाली आली असून आठ कुटुंबांनी स्थलांतर केल्यामुळे चिंता देखील व्यक्त केली जात आहे. अंधश्रद्धेच्या या प्रकाराने राज्यातील अनेक ग्रामीण भागात अंधश्रद्धेचे भूत कायम असल्याचे दिसून येत आहे.

वाचाः पुणेकर आजोबांना हनी ट्रॅपमध्ये अडकवले, लग्न करायचे म्हणत तरुणीने १ कोटी रुपये उकळले, अन्

Source link

8 family leave village in nashiknashik crime newsNashik newsनाशिक आजच्या बातम्यानाशिक ताज्या बातम्या
Comments (0)
Add Comment