२००४मध्ये आलेल्या ‘काया तरण’ या चित्रपटातून त्यानं सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. अंगद आणखी एका गोष्टीसाठी जगभरात लोप्रिय आहे. जगभरातील त्या खास एक टक्के लोकांमध्ये त्याचं नाव घेतलं जातं.
६ व्या वर्षी रणजी ट्रॉफी आणि भारताच्या १९ वर्षांखालील संघातही तो खेळलाय. काही वर्षे खेळल्यानंतर अंगदनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. १ ‘फालतू’ या चित्रपटामुळं खऱ्या अर्थानं त्याला ओळख मिळाली.
अंगद बेदी आणखी एका गोष्टीसाठी चर्चेत असतो. जगातील काही टक्केच लोकांना हे काम करता येतं. या अवघ्या काही टक्क्यांमध्ये अंगदचं नाव येतं. ही खास गोष्ट म्हणजे, अंगद डाव्या आणि उजव्या दोन्ही हातांनी एक सारखंच काम करू शकतो.
लग्नाचा किस्सा
अंगद आणि नेहाच्या लग्नाचा किस्साही प्रचंड चर्चेत आला होता.नेहानं फिल्म फेअरला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आणि अंगदच्या लग्नानंतरचा किस्सा सांगितला. नेहा म्हणाली की, तिनं जेव्हा अंगदसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि ती बातमी सोशल मीडियावर शेअर केली तेव्हा तिला खूप मेसेज आले. पण एकही मेसेज अभिनंदनाचा किंवा शुभेच्छांचा नव्हता. ६०० मेसेजमध्ये तिच्यावर टीकाच केली होती. काही नेटकऱ्यांनी तर शिव्याही दिल्या होत्या. ते मेसेज वाजून नेहा आणि अंगद खूपच नाराज झाले होते.
अंगदनं १० मे मे २०१८ रोजी नेहा धुपियाशी लग्न केलं. नेहा आणि अंगदची पहिली मुलगी मेहरचा जन्म दोघांच्या लग्नाच्या अवघ्या सहा महिन्यांनतर झाला. १८ नोव्हेंबर २०१८ रोजी मेहरचा जन्म झाला.
अंगदच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल’ या चित्रपटातील अभिनयासाठी अभिनेता अंगद बेदी याचं कौतुक करण्यात आलं होतं. अंगदनं या चित्रपटात गुंजन सक्सेना यांच्या भावाची भूमिका साकारली आहे. त्यानं वाट्याला आलेले प्रसंग उत्तम साकारले आहेत.