कठडे तोडून दोन चाकं हवेत, उसाने खच्चून भरलेल्या ट्रॅक्टरचा थरकाप उडवणारा अपघात

नंदुरबार : तापी नदी पुलावर क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात झाला आहे. चक्क पुलावरील कठडे तोडून ट्रॅक्टरची पुढील दोन चाकं वर हवेत गेल्याचं पाहायला मिळालं. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, तरी अधिक क्षमतेपेक्षा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे गरजेचे झाले आहे.

उसाचा गाळप हंगाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर ऊस कारखान्यावर पोहोचवला जात आहे. मात्र ऊस घेऊन जाणाऱ्या वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत असल्याने अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे.

आयन एलएलपी साखर कारखाना येथे ऊस घेऊन जाणाऱ्या एका ट्रॅक्टरच्या अपघात झाला आहे. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही आहे. मात्र अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती.

ट्रिपल सीट निघालेल्या मित्र-मैत्रिणींना गाडीची जोरदार धडक, दोघा जणांचा जागीच मृत्यू
क्षमतेपेक्षा अधिक ऊस असल्याने वाहन चालकाचा ताबा सुटला आणि तापी नदीवरील पुलाचे कठडे तोडून ट्रॅक्टचा पुढचा भाग नदीपात्राच्या दिशेने उभा राहिला आहे.

रात्रभर चुलत बहिणीच्या लग्नाचा स्वयंपाक, पहाटे भावाने लिंबाच्या झाडावर आयुष्य संपवलं
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे असे अपघात दिवसागणित वाढत चालले आहेत, मात्र संबंधित आरटीओ विभाग याकडे सर्रास दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे, मात्र एखादी मोठा अपघात होण्याची वाट पाहत आहे का असा देखील प्रश्न आता नागरिकांकडून केला जात आहे.

वंदे भारत एक्सप्रेस देशाला समर्पित करताना अत्यानंद होतोय, पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात

Source link

maharashtra accident news todaynandurbar accidentnandurbar tapi river bridgenandurbar ugarcane tractor accidentsugarcane tractor wheels in airउसाच्या ट्रॅक्टरला अपघातऊस वाहतूक ट्रॅक्टर चाक हवेतनंदुरबार अपघातनंदुरबार तापी नदी पूल अपघात
Comments (0)
Add Comment