चार पैकी २ मुलं झाली बेपत्ता; चार दिवसांनी दिसले ते पाहून पालकांच्या पायाखालची जमीन सरकली

सांगली : गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असणारे जतच्या अमृतवाडी येथील दोघा बहीण-भावाचे मृतदेह विहिरीमध्ये आढळून आले आहेत. एका शेतमजुराची ही दोन मुलं चार दिवसांपासून बेपत्ता होती. अखेर त्यांचे मृतदेह एका विहिरीत आढळून आले आहेत. सुलोचना गवळी (वय ५ वर्षे) आणि इंद्रजीत गवळी (वय ३ वर्षे) अशी या दोघा चिमुरड्यांची नावे आहेत. या घटनेमुळे अमृतवाडीत हळहळ व्यक्त होत आहे.

नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा येथील आनंद गवळी व त्यांच्या पत्नी हे दोघेजण जत तालुक्यातल्या अमृतवाडी येथील बागायतदार शेतकरी दीपक हत्ती यांच्याकडे कामाला होते. चार दिवसांपूर्वी आनंद गवळी यांच्या पत्नीची तब्येत बिघडल्याने उपचारासाठी आनंद गवळी यांनी पत्नीला जत या ठिकाणी उपचारासाठी नेले होते. यावेळी त्यांची असणारी चार मुलं घरात होती. सायंकाळी परत आल्यानंतर त्यांची दोन मुलं झोपलेली आढळून आली. तर सुलोचना व इंद्रजित ही मुलं ही गायब असल्याचे निदर्शनास आलं.

Pune Crime: छळाला कंटाळली, सुनेने सासूचा वचपा काढायचे ठरवले, रचला भलताच बनाव, पोलिसही चक्रावले
त्यानंतर घरात नसलेल्या दोघा बहीण भावाचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. गावात आणि जत पोलीस पोलिसांच्याकडून देखील या मुलांचा शोध घेण्यात येत होता. तर मुलं सापडत नसल्याने अपहरणाचा तक्रार देखील दाखल झाली होती. घराजवळ असणाऱ्या एका विहिरीमध्ये ही मुलं पडल्याचा संशय आल्याने त्या ठिकाणी देखील शोध मोहीम राबवण्यात आली होती. मात्र त्या विहिरीत मुलं आढळून आली नव्हती.

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासाठी ‘ते’ रात्री साडेदहापर्यंत जागे होते, डॉ. गोर्‍हेंनी सांगितली कोश्यारींची आठवण
सर्वत्र शोध मोहीम राबवून देखील मुलं सापडत नसल्याने नेमकं या मुलांचं काय झालं किंवा ही मुलं कुठे बेपत्ता झाली,असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. मात्र अखेर आज दुपारी घरापासून काही अंतरावर असणाऱ्या दुसऱ्या विहिरीमध्ये दुपारी ही दोन्ही मुलांचे मृतदेह तरंगत असल्याचं आढळून आले. याबाबत अधिक तपास आता जत पोलीस करत आहेत.

Amazon, Flipkart ला दणका, सरकारने पाठवली नोटीस; जाणून घ्या काय आहे प्रकरण

Source link

Missing children found deadSangli newssangli news todayबेपत्तामुलांचे मृतदेह आढळलेसांगली
Comments (0)
Add Comment