रविवार ठरला घातवार, भीषण अपघातात एकाच गावातील तिघांचा जागीच मृत्यू, वाहनाचा झाला चुराडा

मलकापूर : दसरखेडनजिक तालसवाडा पुलाजवळ आयशरला भरधाव टिप्परने जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ वर हा अपघात झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर तालसवाडाजवळ पुलावर टिप्पर व आयशरची झालेली ही धडक एवढी भिषण होती की, या धडकेत मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील ३ जण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बुलढाणा येथील एका हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहे.

मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील आयशर ट्रक (क्रमांक mh 48 j 0061) विटांचा माल घेवून दसरखेडकडून मलकापूरकडे जात होता. दरम्यान आशयरला टिप्पर क्रमांक mh 46 af 2782 ने सकाळच्या सुमारास दसरखेडनजीक असलेल्या तालसवाडा पुलाजवळ जोराची धडक दिली. या धडकेत आयशच्या समोरच्या भागाचा अक्षरश चुराडा झाला. यामध्ये राजू रतन चव्हाण (वय ३७ वर्षे), जीवन सुरेश राठोड (वय २७ वर्षे) व सुनिल ओंकार राठोड (वय ३३ वर्षे) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. हा अपघात आज रविवार, १२ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास झाला.
VIDEO: बदलापूर एमआयडीसीत भीषण आग, संपूर्ण केमिकल कंपनी जळून खाक, काही कामगार जखमी
अपघातात मोहेगावातील तिघांचा मृत्यू

या भीषण अपघातात गंभीर जखमी राम मलखंब राठोड (वय २६ वर्षे) याच्यावर बुलढाणा येथील एक हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातात जागीच ठार झालेले तिघेजण हे मोहेगाव येथील रहिवासी आहेत. गावातील तिघांचा अपघाती मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
ट्रेनमध्ये प्रवासी महिला झोपली होती, चोरट्याने साधला डाव, पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या
एकीकडे जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांचा वेग सुसाट झाल्यानंतर तिथे अनेक अपघात घडत असल्याच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. तर मुंबई-नागपूर महामार्ग क्रमांक सहावर अपघात झाल्याने जिल्ह्यात आता समृद्धी महामार्गाच्या पाठोपाठ आता मुंबई-नागपूर महामार्गांवर देखील वाहनांचा वेग नियंत्रित करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.
अरे त्या सुधीर तांबेंना घ्या पुढे; शरद पवार यांच्या एका वाक्याने राजकारणात वेगळीच चर्चा

Source link

3 died in an accidentbuldhana newsSevere accident in Malkapurअपघातात तिघांचा मृत्यूमलकापूर अपघात
Comments (0)
Add Comment