‘या’ जिल्ह्यासाठी पुढचे २ दिवस अतिशय धोक्याचे, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

हायलाइट्स:

  • ‘या’ जिल्ह्याला हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा
  • मुंबईसह कोकणकिनारपट्टीवर ढगाळ वातावरण
  • आज मुसळधार पावसाने मुंबई तुंबली

मुंबई : बुधवारी सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये आणि राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. रायगड जिल्ह्यातही दोन दिवसापासून पावसाचे आगमन झालं. अशात १० ते ११ जूनला जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. इतकंच नाही तर ताशी १२ ते २० किमी वेगाने वारे वाहतील असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढचे दिवस हे रायगडकरांसाठी धोकादायक असणार आहेत. यामुळे गरज नसल्यास घराबाहेर पडू नका आणि अतिमहत्त्वाच्या कामासाठी हवामानाचा अंदाज घेतच बाहेर पडा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शहरामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे नदी, नाले, विहीरी, तलावाच्या ठिकाणी पोहोण्यासाठी जाऊ नका. विजेच्या खांबाजवळही थांबू नका. आपली काळजी घ्या असं आवाहन करण्यात आलं आहे.

खरंतर पुढच्या चार दिवसांमध्ये मुंबईसह राज्यभरात प्रत्येक जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर पावसाला सुरुवात झाली असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मुंबईसह कोकणकिनारपट्टीवर देखील ढगाळ वातावरण आहे. यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये काळोख दाटल्याचं पाहायला मिळतं. मुंबईच्या बऱ्याच भागात पावसाने हजेरी लावल्यामुळे मुंबईची पुन्हा तुंबई झाली आहे. सखोल भागात पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

Mumbai Rains : मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात, पुढचे ४ दिवस धोक्याचे, हवामानाचा इशारा
दरम्यान, मुंबई उपनगरांसह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये चार दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. ९ ते १२ जूनपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस होईल. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. इतकंच नाहीतर हवामान खात्याच्या अंदाजानुसार, प्रशासनानेही सतर्क राहत योग्य ती योजना आखावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.

हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तातडीने मुंबई महानगर क्षेत्र, कोकणातील सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्र्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घ्यावी, या अतिवृष्टी काळात गरज पडल्यास मदतीसाठी तटरक्षकदल, नौदलाला तयार राहण्याची सूचना कळवण्यात यावी असेही त्यांनी सांगितलं आहे.

Weather Alert : मुंबईसह राज्यासाठी ‘हे’ ४ दिवस धोक्याचे, हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा
अतिवृष्टीच्या या काळात आवश्यक अशा सर्व ठिकाणी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात याव्या, ओएनजीसीसह इतर केंद्रीय संस्थांना या काळात होणाऱ्या अतिवृष्टीची माहिती देऊन सतर्क राहण्यास सांगण्यात याव असंही ते यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

Source link

Heavy rains in MumbaiMaharashtra weatherMonsoon in maharashtraMumbai rainsMumbai weathermumbai weather updateraigad districtWeather Alertweather todayweather today at my location
Comments (0)
Add Comment