Weather Report : राज्यात ब्रेकनंतर पाऊस पुन्हा कोसळणार, ४-५ दिवसांत दमदार कमबॅक

हायलाइट्स:

  • राज्यात ब्रेकनंतर पाऊस पुन्हा कोसळणार
  • ४-५ दिवसांत दमदार कमबॅक
  • भारतीय हवामान खात्याची माहिती

मुंबई : राज्यात महापुराच्या परिस्थिती नंतर दडी मारलेल्या पावसाने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवलं. पण आता मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार ते पाच दिवसांनी मध्ये राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.

ज्येष्ठ हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी यासंबंधित ट्वीटदेखील केलं आहे. राज्यात येत्या चार ते पाच दिवसांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. यातही जर मुसळधार पाऊस झाला तर शेतकऱ्यांना पिक टिकवण्याचं संकट असणार आहे.
सासून सुनेला भावाच्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास पाडलं भाग, कारण वाचून हादराल
खरंतर, गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई, कोकण, विदर्भ आणि सर्वदूर भीषण परिस्थिती ओढावली होती. मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. पण सध्या जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारली आहे. पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस सुरू आहे.

हवामान खात्याने 15 ऑगस्टनंतर पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात सर्वदूर पाऊस होणार अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. इतकंच नाही तर कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि यावेळी विदर्भ आणि मराठवाडामध्ये चांगला पाऊस होईल असा हवामान खात्याने म्हटले आहे.
ज्या स्वप्नासाठी रात्रीचा दिवस केला त्यानेच घेतला जीव, स्वतः बनवलेल्या हेलिकॉप्टरची चाचणी करताना तरुणाचा मृत्यू

Source link

maharashtra rain newsmaharashtra rain news latestMaharashtra weather alertmaharashtra weather newsrain news in mumbaiweather reportweather todayweather today at my location
Comments (0)
Add Comment