ग्रहणाच्या वेळीही होते दर्शन
ग्रहणाच्या वेळीही दर्शन होते राजस्थानमध्ये असलेल्या श्रीनाथजींच्या भव्य स्वरूपाचे दर्शन घेण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी लोक दूरूनदूरून येतात. श्रीनाथजींचे मंदिर दिवसभरात आठ दर्शनासाठी उघडले जाते आणि आठवेळा होणाऱ्या या दर्शनासाठी आठ आरत्याही असतात. यासोबतच प्रत्येक दर्शनासाठी वेळही ठरलेली आहे. श्रीनाथजींचे मंदिर हे एकमेव मंदिर आहे, जे सूर्यग्रहणाच्या काळातही खुले असते. ग्रहणाच्या वेळी अनेकांना दर्शन घेता येते फक्त इतर सर्व पूजा-पाठ बंद केली जाते, अशी येथील परंपरा आहे.
कृष्ण जन्माष्टमीला असा असतो नजारा
श्रीनाथजी मंदिरात जन्माष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हे एकमेव मंदिर आहे जिथे कृष्णाच्या जन्माच्या वेळी २१ तोफांची सलामी दिली जाते. हे दृश्य पाहण्यासाठी जगभरातून अनेक लोक येतात. या दिवशी पूजा ब्रज असे दृश्य दिसते. अंबानी कुटुंबाचीही श्रीनाथजींच्या मंदिरावर नितांत श्रद्धा आहे. याच कारणामुळे मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपूडा या मंदिरात झाला.
असा आहे मंदिराचा इतिहास
औरंगजेबाच्या आदेशानुसार भारतातील अनेक मंदिरे पाडली जात होती. त्याचवेळी मथुरेतील श्रीनाथजींचे मंदिर पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली. तत्पूर्वी औरंगजेबाच्या सैनिकांनी देवाची मूर्ती फोडल्याने मंदिराचे पुजारी दामोदरदास बैरागी यांनी मूर्ती मंदिराबाहेर आणली. दामोदरदास हे वल्लभ पंथाचे होते आणि ते वल्लभाचार्यांचे वंशज होते. पुजार्याने मूर्ती बैलगाडीत लपवली आणि मथुरेच्या बाहेर वृंदावन गाठले.
राजा राणा राज सिंह यांनी घेतली जबाबदारी
पुजारी दामोदरदास यांनी अनेक राजांना नाथजींचे मंदिर बांधून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची विनंती केली होती परंतु औरंगजेबाच्या भीतीने त्यांनी नकार दिला. त्यानंतर पुजार्याने मेवाडचा राजा राणा राज सिंह यांना संदेश दिला. कारण तोपर्यंत फक्त राणा राज सिंह यांनी औरंगजेबाला आव्हान दिले होते. राणा राज सिंहने पुजाऱ्याचे म्हणणे मान्य केले आणि औरंगजेबाला आव्हान दिले की जर तुमच्या एका सैनिकानेही या मूर्तीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर एक लाख राजपूतांना सामोरे जावे लागेल.
इथे आहे श्रीनाथजींची चरणचौकी
बैलगाडीतच मूर्ती ठेवून पुजारी राजस्थानहून वृंदावनला रवाना झाले. प्रथम जोधपूरच्या चौपासनी गावात पोहोचले आणि अनेक दिवस बैलगाडी येथे उभी राहिली आणि बैलगाडीतच भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्यात आली. जिथे बैलगाडी उभी होती तिथे आज मंदिर बांधले गेले आहे आणि त्या काळापासून आजतागायत भगवान श्रीनाथजींचे पादूका या मंदिरात ठेवण्यात आले आहेत. ते ठिकाण चरणचौकी म्हणून ओळखले जाते.
नाथद्वारात यावर्षी झाले मंदिराचे बांधकाम पूर्ण
श्रीनाथजींची मूर्ती चौपासनी गावातून सिहाड येथे आणण्यात आली. मूर्तीच्या स्वागतासाठी राजा स्वतः सिहाड गावात पोहोचले होते. उदयपूरपासून ३० मैलांवर आणि जोधपूरपासून १४० मैलांवर सिहाड गाव वसलेले आहे, ज्याला आज नाथद्वारा म्हणून ओळखले जाते. राणा राज सिंह यांनी फेब्रुवारी १६७२ मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण केले आणि त्यानंतर श्रीनाथांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.
असे आहे श्रीनाथजींचे स्वरूप
मंदिरातील श्रीनाथजींची मूर्ती काळ्या संगमरवरी दगडाची आहे. बाळकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलल्याचे श्रीनाथजींचे रूप आहे. ज्याचा डावा हात हवेत उंचावलेला असतो आणि उजव्या हाताची मुठ कंबरेवर असते. सिंह, दोन गायी, पोपट, मोर आणि तीन ऋषींची प्रतीमा आहे. परमेश्वराच्या ओठांच्या खाली एक हिरा देखील जडलेला आहे. हा हिरा औरंगजेबच्या आईने दिला होता, अशी मान्यता आहे.