Jalgaon:महामार्गावर भीषण अपघात : ९ जण जागीच ठार

राज्यात अपघातांची मालिका कायम असून आज पुन्हा एक अपघात झाला आहे. या अपघातात ९ जण ठार झाले आहेत. बुलढाण्यानजीक लक्झरी उलटून आग लागल्याने २६ प्रवासी ठार झाल्याची घटना नुकतीच घडली होती. यातच आज झालेल्या अपघातात ९ जण ठार झाले आहेत.

शिरपूरजवळील पळासनेर बायपासवर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव कंटनेरचे अचानक ब्रेक निकामी झाल्यानंतर कंटेनर दोन वाहनांना उडवले व त्यानंतर कंटेनर हॉटेलमध्ये शिरल्यानंतर हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेल्या ग्राहकांसह वेटर व अन्य नागरीक मिळून ९ हून अधिक जणांचा मृत्यू ओढवला. हा भीषण अपघात मुंबई-आग्रा महामार्गावरील पळासनेर बायपासवर मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता घडला. या अपघाताने राज्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी वेळीच धाव घेत मदत कार्याला सुरूवात केली

Comments (0)
Add Comment