आचार्य कॉलेजमध्ये बुरखा किंवा हिजाब घालण्यावर बंदी…? आता मात्र नियमांमध्ये शिथिलता

Acharya College Hijab Controversy: काही वर्षांपूर्वी कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातील ज्युनिअर कॉलेजमध्ये हिजाब घालण्यावरून सुरु झालेल्या वादाने सर्वत्र अशांतता पसरली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच मुंबईतील एका नामांकित कॉलेजमध्ये हिजाब (बुरखा) घालून यनेयावर बंदी घालण्यात आली होती. कालांतराने हे प्रकरण शांतही झाले.

आता तब्बल वर्ष-दिड वर्षांनंतर मुंबईतील एका कॉलेजमध्ये याच विषयावरून वादाच्या भोवऱ्यात अडकत असल्याचे समोर आले आहे. चेंबूरच्या एन. जी. आचार्य आणि डी. के मराठे कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये (N. G. Acharya & D. K. Marathe College of Arts, Science & Commerce) हिजाब (बुरखा) परिधान करुन येण्यावर बंदी घालण्यात आली असल्याचे समोर आहे.

आचार्य कॉलेजने घेतलेल्या या निर्णयाविरोधात कॉलेजमधील मुस्लिम विद्यार्थींनींनी कॉलेज परिसरात काल, २ ऑगस्ट २०२३ ला आंदोलन केले असून, विविध विद्यार्थी संघटनांनीही विद्यार्थिनींच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीयो व्हायरल झाला होता, ज्यात बुरखा घातलेल्या विद्यार्थिंनींना कॉलेजच्या गेटमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत होती.

कॉलेज प्रशासनाच्या या वागणुकीनंतर या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थिनींचे कॉलेज प्रशासनाविरोधातील आंदोलन आणि विद्यार्थी संघटनांनी मांडलेली आक्रमक भूमिका यानंतर कॉलेजच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या प्रकरणासंदर्भात महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या टीमने आचार्य कॉलेज प्रशासनाला संपर्क साधून, घडल्या प्रकाराबद्दल आणि या नव्या नियमांबद्दल विचारणा केली असता कॉलेजच्या प्राचार्या डॉ. विद्यागौरी लेले यांनी या नियमांबद्दल कॉलेजमधील विद्यार्थ्यांना पूर्व कल्पना दिली असल्याचे सांगितले आहे.

नेमका प्रकार काय…?

  • मुंबईत चेंबूरच्या एन. जी. आचार्य कॉलेजमध्ये हिजाब घालणाऱ्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. यावर्षीपासून आचार्य कॉलेजमध्ये अकरावी आणि बारावीच्या (Junior College) विद्यार्थ्यांना ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात कॉलेजमध्ये हिजाब घालून येणाऱ्या ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींना गेटवरच अडविण्यात आले.

  • कॉलेजने ठरवून दिलेला युनिफॉर्मच घालावा, अशी माहिती विद्यार्थी आणि पालकांना १ मे ला कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पालकसभेच्या माध्यमातून आणि विविध नोटीस आणि ऑनलाइन मॅसेजच्या स्वरूपात देण्यात आली होती.

  • कॉलेजच्या नव्या नियमानुसार कॉलेजमधील अकरावी-बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी कॉलेजमधून गणवेश (Uniform) खरेदी केला होता. शिवाय, १ मे २०२३ ला कॉलेजमध्ये पार पडलेल्या पालकसभेत ५०० हून अधिक पालकांनी स्वाक्षरी करून कॉलेज प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाला मान्यता दिली असल्याची माहिती कॉलेजच्या प्राचार्यानी मटा ऑनलाइनला दिली.

  • यावर्षी, आचार्य कॉलेजमधील कनिष्ठ महाविद्यालय विभागात साधारण २३०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. ज्यातील अंदाजे २९० विद्यार्थिनी मुस्लीम धर्मीय आहेत. परंतु, पालक सभेस उपस्थित असणाऱ्या कोणत्ययी विद्यार्थी अथवा पालकांनी या निर्णयावर त्यावेळी कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला नसल्याचे मत कॉलेज प्रशासनाच्या वतीने व्यक्त केले जात आहे.

  • १५ जूनपासून शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाल्यानंतर कॉलेजमधील सगळ्या विद्यार्थ्यांना गणवेशासंदर्भातील नियमांबद्दल वारंवार सूचित करण्यात आले होते. मात्र अनेक विद्यार्थ्यांनी या नियमांकडे काणा डोळा केला. १ ऑगस्ट २०२३ पासून या नियमाचे काटेकोर पालन करण्याचा निर्णय घेत कॉलेज प्रशासनाने कॉलेजच्या प्रवेशद्वारावरच विनागणवेश येणाऱ्या किंवा हिजाब/बुरखा/नकाब घालून येणाऱ्या विद्यार्थ्यांना गेटवर थांबवण्यास सुरुवात केली.

  • तर कॉलेजमध्ये हिजाब आणि ओढणीला परवानगी द्यावी अशी मागणी मुस्लीम विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने केली जात आहे.

अखेर निर्णयात शिथिलता :

चेंबूर येथील एन जी आचार्य कॉलेजमध्ये अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ड्रेस कोड लागू केल्यानंतर हिजाब घालून आलेल्या विद्यार्थिनींना गेटवरच अडविण्यात आले. त्यामुळे या कॉलेज बाहेर विद्यार्थी आणि पालकांनी एकत्र येत कॉलेज प्रशासनाच्या या भूमिकेचा विरोध करत हिजाब घालून विद्यार्थिनींना कॉलेजमध्ये प्रवेश दिला जावा अशी मागणी करत गोंधळ घातला.

१ ऑगस्टपासून युनिफॉर्म घालूनच विद्यार्थी कॉलेजमध्ये प्रवेश करतील अशा सूचना कॉलेजतर्फे देण्यात आल्या होत्या. तर, हिजाब घालून विद्यार्थिनींना कॉलेजमध्ये प्रवेश दिला जावा. रस्त्यावर विद्यार्थिनी हिजाब काढून कॉलेजमध्ये प्रवेश करणार नाहीत. यासोबतच विद्यार्थिनींना दुपट्टा घालण्याची परवानगी दिली जावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली. अखेर, विद्यार्थीनी-पालक आणि पोलीस प्रशासनाच्या सांगण्यावरून कॉलेजच्या नियामक मंडळाने यावर्षी या नियमांमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे.

हिजाब/नकाब/बुरखा घालून विद्यार्थिनी कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात. मात्र, कॉलेजमध्ये आल्यावर आणि कॉलेजमध्ये वर्गात, प्रयोगशाळेत, ग्रंथालय, कॉलेजचे मैदान आणि कँटिंग अशा कोणत्याही ठिकाणी विद्यार्थिनींना हिजाब/नकाब अथवा बुरखा गघालण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे, घरी जाताना विद्यार्थींनी पुन्हा बुरखा/हिजाब घालून कॉलजबाहेर पडू शकतात असा निर्णय कॉलेज प्रशासनाने घेतला आहे.

सदर, नियम हे फक्त आचार्य कॉलेजमधील ज्युनिअर (अकरावी-बारावी)च्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनसाठी असून, विद्यापीठ नियमानुसार सिनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी असा कोणताही नियम लागू करण्यात आला नाही.

-डॉ.विद्यागौरी लेले (प्राचार्या, एन. जी. आचार्य आणि डी. के मराठे कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, चेंबूर)

Source link

Acharya CollegeAcharya College Hijab Controversyburqa banburqa ban newshijab controversyhijab controversy in karnatakahijab controversy latest newsHijab Controversy Maharashtra Mumbain. g. acharya & d. k. marathe college of artsscience & commerce
Comments (0)
Add Comment