अमळनेर शहरात एका तरूणाचा तर जळगाव शहरात एका महीलेचा खुन

पैश्यांच्या वादातून एका ३५ वर्षीय तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना अमळनेर शहरातील नगरपालिकेच्या हशीमजी प्रेमजी व्यापारी संकुलात आज शुक्रवारी पहाटे घडली.

प्रकाश दत्तू पाटील (वय ३५, रा. गांधलीपुरा,अमळनेर) असे मयताचे नाव असून. अवघ्या तीन तासांत पोलिसांनी आरोपी निष्पन्न केला.
याबाबत असे कि, हशीमजी प्रेमजी व्यापारी संकुलाच्या दुसऱ्या मजल्यावर आज पहाटे प्रकाश पाटील या तरुणाचा पैशाच्या वादातून खून करण्यात आला. सकाळी सफाई कामगार झाडलोट करण्यासाठी गेले असता सदर प्रकार उघडकीस आला आहे.या घटनेचे वृत्त कळताच रजेवर असलेल्या पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राकेशसिंग परदेशी, हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर, नगरसेवक नरेंद्र संदानशीव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.पोलिस अधिक्षक प्रविण मुंढे यांनी घटनास्थळी भेट दिली.दरम्यान,अवघ्या तीन तासांतच पोलिसांनी हा खून कैलास पांडुरंग शिंगाणे याने केल्याचे निष्पन्न केले. आरोपी कैलास फरार झाला असून त्याच्या कुटुंबियांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.

तर जळगाव शहरातील तुळजाई नगरात राहणाऱ्या वंदना गोरख पाटील वय-४२ या भाजीपाला विक्री करणार्या महिलेचा गळा आवळून आणि चेहऱ्यावर काहीतरी वस्तूने मारहाण करून खून करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला आहे. घटनास्थळी एमआयडीसी पोलिसांनी धाव घेतली असून तपास सुरु आहे.घटना घडली त्या घरात महिलेचा चेहरा छिन्नविच्छीन्न अवस्थेत आढळून आला आहे.सदर महिलेचा पती हा मयत असुन तीच्या पश्चात मुलगा व सुन असा परीवार आहे. मुलगा हा कामानिमित्त लातुर येथे आहे. घटना नेमकी कशी घडली याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

Comments (0)
Add Comment