जातीनिहाय जनगणनेला संघाचा विरोध, रेशीमाबागेतच प्रश्न विचारताच एकनाथ शिंदे म्हणाले…

नागपूर: ‘महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. या राज्याची संस्कृती इतर राज्यांपेक्षा भिन्न आहे. येथे सर्व जातीधर्माचे लोक आनंदाने सोबत राहतात, एकमेकांचे सण-उत्सव साजरे करतात. त्यामुळे राज्यात जातीय सलोखा, कायदा-सुव्यवस्था कायम राहायला हवी. या पार्श्वभूमीवर सर्व घटकांचा विचार जाणून घेत जनतेची भावना लक्षात घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जातनिहाय गणनेच्या मुद्द्यावर बुधवारी रेशीमबागेतील स्मृती मंदिरस्थळी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशातून जातीय विषमता नष्ट करायची असेल तर जातनिहाय गणना व्हायला नको, अशी भूमिका जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेची भावना जाणून घेत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. मात्र, राज्यात जातनिहाय गणना होणार की नाही याबाबत स्पष्ट मत व्यक्त करण्यास नकार दिला.

मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी सकाळी १०.३० वाजता स्मृती मंदिर परिसराला भेट दिली. मागील हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदा रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसराला भेट देण्यास आले होते. त्यानंतर यंदाची ही त्यांची दुसरी भेट ठरली. यावेळी त्यांनी संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस्थळांना पुष्पार्पण करत अभिवादन केले. त्यानंतर संघाचे अखिल भारतीय सहसंपर्कप्रमुख सुनील देशपांडे यांच्यासोबत त्यांची जवळपास वीस मिनिटे बंदद्वार चर्चा झाली. संघाद्वारे त्यांना स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ भेट स्वरूपात देण्यात आले. त्यांच्यासोबत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिवसेनेचे (शिंदे गट) प्रतोद भरत गोगावले, भाजपचे दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते हेदेखील उपस्थित होते.

जातिव्यवस्था भारताच्या प्रगतीत अडथळा, ती कालबाह्य व्हावी, जातनिहाय जनगणनेला संघाचा विरोध

पशूंची गणना केली जाते, मग जातिगत जनगणना का नाही? बच्चू कडूंचा संघ आणि भाजपला सवाल

राज्यासह देशात पशूंची गणना केली जाते, मग जातिगत जनगणना का नाही, असा सवाल प्रहार पक्षाचे प्रमुख आणि सत्ताधारी पक्षातील आमदार बच्चू कडू यांनी विधानभवन परिसरात प्रसिद्धीमध्यमांशी बोलतांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला केला.

१८८१ मध्ये राज्यात ३१ लाख मराठा कुणबी, ब्रिटिशांनी केलेली जातनिहाय जनगणना, विश्वास पाटील यांचे संशोधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मंगळवारी जातिगत जनगणनेला विरोध केला होता. त्यावर विरोधकांनीही संघ आणि भाजपवर चांगलीच टीका केली होती. आता बच्चू कडू यांनी त्यावर भाष्य करतांना म्हटले की, जातिगत जनगणना व्हायलाच पाहिजे. त्याला आमचे (प्रहार पक्षाचे) समर्थन असल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले आहे. त्याने कोणत्या समाजाचा लोकसंख्येत किती वाटा आहे, हे स्पष्ट होईल. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जारांगे पाटील यांनी आता पुन्हा आंदोलन केल्यास मी कार्यकर्ता म्हणून त्यात सहभागी होईल. शेवटी मराठा समाजाला आरक्षण मिळून न्याय मिळायलाच हवा. विदर्भाच्या प्रश्नावर केवळ एक तास चर्चा होणे योग्य नाही. त्याने विदर्भाला न्याय मिळू शकत नसल्याचेही कडू म्हणाले.

कायद्याच्या चौकटीत बसणारं, टिकणारं मराठा आरक्षण देण्यासाठी जे करता येईल ते करणार ; शिंदेंची विधानसभेत घोषणा

Source link

caste censusCM Eknath ShindeNagpur newsreshim baugRSSrss hqएकनाथ शिंदेजातीनिहाय जनगणनाराष्ट्रीय स्वयंसेवक संघ
Comments (0)
Add Comment