मनोज जरंगेंची भेट घेण्यासाठी जात असताना वडीगोद्री इथे सुरु असलेल्या ओबीसी आंदोलकांनी सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. जरांगे यांच्या भेटीनंतर मंत्र्यांनी ओबीसी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी गिरीश महाजन यांनी उपोषणाला बसलेल्या ओबीसी बांधवांच्या मनात खंत आहे की ओबीसी आरक्षणावर गदा येते की काय? मात्र मी त्यांना आश्वासित केलं की,ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे.याची खात्री आम्ही सरकार म्हणून देत आहे, असं म्हटलं.
फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होते ते दुसऱ्यांचं सरकार आल्याने गेलं.आता क्युरेटिव्ह पीटिशनवर निर्णय येईल.आता मागासवर्ग आयोग नेमण्यात आला आहे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण देणार आहोत. या लवकर निकाल लागेल.मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं महाजन म्हणाले.
मराठा समाजाच्या नोंदी सापडत नाहीत.सरसकट आरक्षण मिळणारा नाही ही भूमिका सरकारने मांडली आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी आहे ते ओबीसीमध्ये आहेत.काही ठिकाणी ९९ टक्के लोकांच्या नोंदी कुणबी आहे.त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळत आहे.फक्त मराठवाड्यात थोडी अडचण आहे.मात्र सरकार मराठवाड्यात नोंदी शोधत आहे.ज्यांच्याकडे नोंदी त्यांना प्रमाणपत्र मिळेल, असं महाजन म्हणाले.
छगन भुजबळ हे ओबीसींचे नेते आहेत.ते भूमिका मांडत आहे.दोन्ही समाजाने टोकाचं बोलू नये. हे शाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे.या राज्यात टोकाची भूमिका घेता कामा नये. अशी भाषा केल्याने समजा समाजात तेढ निर्माण होते आहे.यामुळे दोघांनी अशी भाषा करू नये. दोघांनी सन्मानाने कायद्याच्या भाषेत बोलावे.वातावरण दूषित होता काम नये, असंही महाजन यांनी सांगितलं.
Read Latest Maharashtra News And Marathi News