मनोज जरांगेंच्या स्मरणशक्तीत गडबड; छगन भुजबळांकडून ‘अनुलोम-विलोम’चा सल्ला, म्हणाले…

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या स्मरणशक्तीमध्ये गडबड आहे. ते एकाच भाषणात दुहेरी बोलतात. भुजबळांनी हॉटेल जाळ्याचा जरांगे आरोप करतात, मराठ्यांना डाग लागल्याचे म्हणतात. ते यापूर्वी बीड सरकारी अधिकाऱ्यांनी जाळले म्हणाले होते. आजच्याच सभेत मराठ्यांच्या वाट्याला जर गेला तर बीडला काय होते हे लक्षात ठेवा, असे म्हणत आहेत. परंतु, असल्या कोल्हेकुईला मी घाबरत नाही असे प्रत्युत्तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी जरांगेंना दिले.

जरांगेंच्या जन्माच्या अगोदरपासून दादागिरीविरोधात लढतोय असे सांगत जरांगेंनी अनुलोम, विलोम, प्राणायम, ध्यानधारणा करावी हा सल्ला त्यांना मित्र म्हणून देतो पण मला ते मित्र मानणार नाहीत, असा टोलादेखील भुजबळ यांनी लगावला. जरागेंच्या सभेनंतर भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन जरांगेंवर टीकास्र सोडले.

….असल्या कोल्हेकुईला घाबरत नाही, मनोज जरांगेना छगन भुजबळांचं प्रत्युत्तर तर एकनाथ शिंदे यांचं संयमाचं आवाहन
भुजबळ म्हणाले…

– सुप्रीम कोर्टात ‘क्युरेटिव्ह पिटिशन’ दाखल करून घेण्यात आले, हे दिलासादायक आहे. आम्ही मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याच्या बाजूने आहोत. वेगळे आरक्षण मराठा समाजाला मिळेल ज्याला आमचा विरोध नव्हता, असे भुजबळ यांनी म्हटले.

– बीडमधील मनोज जरांगेंचे अर्धे भाषण छगन भुजबळ आणि लेकरं वगैरेबाबत होते, असा टोला भुजबळ यांनी लगावला. दि. २० जानेवारीपर्यंत शांत राहणार आहेत, तोपर्यंत ते रुग्णालयात राहतील किंवा घरी राहतील. तुम्ही तुमची लढाई लोकशाही मार्गानं लढा, आरे म्हटलं तर कारे म्हणणार आहे.

– मला हौस नाही कुणाला दुखावण्याची, मला जबाबदारी कळते. सारखे-सारखे बोलणार असाल तर मग बोलावे लागेल. सन १९९१ पासून या देशात जातगणना करा अशी मागणी करतोय. देशात विविध राज्यांत कुठलीही एक जात मोठी असते. पाटीदार असेल जाट असेल तरी ती १६ टक्क्यांच्या वर नसेल. ओबीसी प्रवर्ग हा ३७४ जातींचा समूह आहे. महाराष्ट्रात ३७४ जाती एकत्र आल्यावर ५४ टक्के होतात. बिहारमध्ये ती ६३ टक्के पर्यंत आहे, असेही भुजबळ म्हणाले.

‘जरांगेंची छाती १२ इंच’

‘ते एकतर हॉस्पिटलमध्ये राहत नाहीत, तर बाहेर राहतात. १२ इंच छाती आहे, खोकून खोकून उगाच जास्तीचे काही होईल. कोणी ‘आरे’ म्हटले तर ‘कारे’ कोणीतरी करणारच आहे, असा टोलाही भुजबळ यांनी लगावला. लोकशाहीच्या मार्गाने आमदार, मंत्र्यांच्या घराबाहेर शांतेतने बसा. अंतरवाली सराटीत ८० पोलिस जखमी झाले. ते काय पाय घसरून पडले का, असा सवालही भुजबळांनी उपस्थित केला. याबाबत गृहमंत्र्यांनी सभागृहात उत्तर दिले आहे. सगळ्यांची मागणी जातनिहाय जनगणनेची सरकारला मान्य करावी लागेल, असेही भुजबळ शेवटी म्हणाले.

Source link

Bhujbal VS Jarangechhagan bhujbal newsmanoj jarange patilMaratha ReservationNashik newsछगन भुजबळांची जरांगेंवर टीका
Comments (0)
Add Comment