जळगाव: माहेरी गेलेल्या पत्नीला घेण्यासाठी जात असलेल्या पतीचा धावत्या रेल्वेतून पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी ३० डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शहरातील प्रतापनगर जवळ घडली आहे. या संदर्भात जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धर्मा किसन गवळी (४५, रा. पवन नगर जळगाव) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील पवन नगर परिसरात धर्मा गवळी हे आपल्या पत्नी आणि ३ मुलांसह वास्तव्याला होते. गेल्या काही दिवसांपासून धर्मा गवळी यांची पत्नी या त्यांच्या माहेरी मध्यप्रदेशातील खंडवा येथे गेलेल्या होत्या. त्यामुळे धर्मा गौरी हे त्यांना घेण्यासाठी शनिवारी ३० डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता रेल्वेने प्रवास करण्यासाठी निघाले होते. जळगाव शहरातील प्रतापनगर जवळील रेल्वे खंबा क्रमांक ४२१ च्या २ ते ४ च्या दरम्यान धावत्या रेल्वेतून ते पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील पवन नगर परिसरात धर्मा गवळी हे आपल्या पत्नी आणि ३ मुलांसह वास्तव्याला होते. गेल्या काही दिवसांपासून धर्मा गवळी यांची पत्नी या त्यांच्या माहेरी मध्यप्रदेशातील खंडवा येथे गेलेल्या होत्या. त्यामुळे धर्मा गौरी हे त्यांना घेण्यासाठी शनिवारी ३० डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता रेल्वेने प्रवास करण्यासाठी निघाले होते. जळगाव शहरातील प्रतापनगर जवळील रेल्वे खंबा क्रमांक ४२१ च्या २ ते ४ च्या दरम्यान धावत्या रेल्वेतून ते पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन जळगाव तालुका पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी गवळी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलविण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी यांची मयत घोषित केले. मयताच्या खिशात रेल्वेचे तिकीटही आढळून आले. या घटनेमुळे त्यांचे तीन मुले पोरगी झाले आहे. याबाबत जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.