एरंडोल येथील अंगणवाडी सेविकांनी निकृष्ट मोबाईल केले परत


(जिल्हा संपादक:शैलेश चौधरी)

एरंडोल:तालुक्यातील विखरण व कासोदा येथील१० सेविकांनी एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयात निकृष्ट मोबाईल परत दिले. यावेळी प्रकल्प अधिकारी, शैलजा पाटील व वरिष्ठ लिपिक नाकवे उपस्थित होते. तालुक्यात अजून काही गावांतील सेविका निष्कृष्ट मोबाईल जमा करणार आहेत.सध्याच्या मोबाईलची वारंटी-गॅरंटी संपलेली असूनही ते खपवले जातात तर काहींचा कॅमेरा खराब झालेला आहे,काहींचा डिस्प्ले खराब झालेला आहे तर काहींना रेंजच राहत नाही तरीसुद्धा सेविका या घरचे मोबाईल वापरून काम करीत आहेत हे सर्व मोबाईल जमा करून नवीन जास्त जीबी चे दर्जेदार मोबाईल पुरवावे अशी मागणी जळगाव जिल्हा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक)च्या वतीने करण्यात आलेली आहे. मोबाईल जमा करतेवेळी तालुकाध्यक्ष सुनंदा पाटील,ज्योती साळी, अंजना महाजन,रजू बाई माळी,छाया पाटील, तारामती खैरनार,संध्या सोनार,उर्मिला चौधरी , आदी सेविका उपस्थित होत्या असे अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक चे जिल्हा अध्यक्ष अमृत महाजन यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

Comments (0)
Add Comment