भाजप २०२२ ला शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होते, आता २०२४ आलं तरी झालंय का? : शरद पवार

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिर्डीतील पक्षाच्या शिबिरात मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. भाजपकडून ४१५ जागा जिंकणार असं सांगितलं जातं. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, नवी दिल्ली, पंजाबमध्ये भाजप नाही, असं शरद पवार म्हणाले. गोवा, मध्य प्रदेशातील सरकार भाजपनं पाडलं. भाजपवाल्यांनी ४१५ म्हणो, ५०० म्हणो पण आज देशात भाजपला अनुकूल चित्र नाही, असं शरद पवार म्हणाले.

आपल्या हातात सत्ता आल्यानंतर हे करु ते करु अशी अनेक आश्वासनं भाजपनं दिली होती. नरेंद्र मोदी संसदेत क्वचितच येतात. २०१६ ते २०१७ च्या अर्थसंकल्प मांडताना २०२२-२३ मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करु असं सांगण्यात आलं होतं. आज २०२४ आहे, झालंय का दुप्पट उत्पन्न, २०२२ पर्यंत शहरी भागात पक्की घरं देऊ असं सांगायचे, ते आश्वासन हवेतच गेले, असं शरद पवारांनी म्हटलं.
सांगलीतील कवलापूर बनलं गाजराचं गाव, ४५० एकरात शेती, राज्यात नावलौकिक पण शेतकऱ्यांसमोर वेगळंच संकट
संसदेत काही लोक घुसले होते, त्या संदर्भातील चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी मागणी केली होती. पंतप्रधानांनी, गृहमंत्र्यांनी भूमिका मांडण्याची विरोधी पक्षांनी केली होती. मात्र, ते न करता संसदेतील १४६ खासदारांना निलंबित करण्यात आलं. अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे यांचंही निलंबन करण्यात आलं, असं शरद पवार म्हणाले.

रोहित पवार अजून लहान, पहिल्या टर्मचे आमदार, मी त्यांच्याकडे फार लक्ष देत नाही: जितेंद्र आव्हाड
देशातील २५ वयाच्या खाली असणाऱ्या तरुणांपैकी ४२ टक्के मजूर बेकार आहेत. सर्वसामान्य महागाईला तोंड देत आहेत, असं शरद पवार म्हणाले. देशाची अर्थव्यवस्था गंभीर स्थितीत आहे. या देशातील शेतकरी या देशाचा अन्नदाता आहे, तो अनेक गोष्टींमुळं अडचणीत आहे. अवकाळी पाऊस अशा गोष्टींमुळं शेतीचं नुकसान झालं आहे. शेतीमध्ये माणसांची वाढली आहे. लोकसंख्या वाढली. शहरं वाढल्यानं जमिनी गेलेल्या आहेत. शेतकऱ्यांची अवस्था फार गंभीर झालेली आहे. शेतीवरचा बोजा कमी करण्यासाठी धोरण आखा, असं सांगितल्याचं शरद पवार म्हणाले. देशात साखर, कापूस, सोयाबीन, कांदा याची किंमत कमी आहे. शेतीवर बंधन देखील टाकण्यात आली आहेत. कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क, साखरेच्या निर्यातीवर शुल्क लादण्यात आली, असं शरद पवार म्हणाले.
MTHLवरील टोल आकारणी, जुनी पेन्शन ते दूध उत्पादकांना अनुदान, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय
Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

lok sabha electionSharad Pawarराष्ट्रवादी काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस शिबीरलोकसभा निवडणूकशरद पवारशरद पवार बातम्याशिर्डी शिबीर
Comments (0)
Add Comment