मोर्चात ओबीसी समाज नाही तर ओबीसी नेते आडवे येत आहेत, ही त्यांची जुनी सवय – मनोज जरांगे

जालना: अजित पवार यापुढे मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलले तर त्यांचा वेगळा विषय हाती घ्यावा लागेल. तुम्ही तुमच्या ज्ञानाचा ग्रंथ लिहा पण मराठा आरक्षणाबाबत बोलायचं नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी अजित पवारांना दिला आहे. गोदाकाठच्या १२३ गावांच्या संवाद दौऱ्याचा पहिला टप्पा आटोपून जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे पोहचले. त्यानंतर ते आज पत्रकारांशी बोलत होते.
… तर चाळीस गद्दार अपात्र होतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ देत आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले…
पहिल्यापेक्षा या दौऱ्यात लोकांचा पाठिंबा वाढला आहे. जास्त दिवस झाल्यानंतर आंदोलनाची धार कमी होते पण या दौऱ्यात लोकांचा पाठिंबा वाढलेला दिसून आला, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत. मोर्चात आमच्या वाढलेल्या संख्येमुळे सर्वांना आरक्षण मिळणार आहे. अंतरवालीपासून मोर्चात मराठा बांधवांची संख्या कमी असेल. पण पुण्यापासून वाढेल. प्रशासन मोर्चात सहभागी होणाऱ्या लोकांचा आकडा काढत आहे. पण त्यांचाही आकडा चुकेल, असा दावाही त्यांनी केला. आमच्या मुंबई मोर्चात ओबीसी समाज नाही तर ओबीसी नेते आडवे येत आहे. ही त्यांची जुनीच सवय असल्याचा टोला जरांगे यांनी ओबीसी नेत्यांना हाणला आहे.

शरद मोहोळचं काम आभाळाएवढं, चुकीची माहिती देऊ नका | नितेश राणे

राज्य मागासवर्ग आयोगाला सूचना करण्याइतपत आपण मोठे नाही. पण त्यांच्या कामांची माहिती आम्ही घेत आहोत. त्यांनी सर्वेक्षणासाठी जे प्रश्न निवडले आहेत, ते सर्व समाजासाठी असायला हवेत, अशी मागणीही जरांगे यांनी केली आहे. ब्राम्हण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी फडणवीस यांना पत्र देणार असल्याचे जरांगे यांनी म्हटलं आहे.

Source link

manoj jarange newsmanoj jarange on ajit pawarmanoj jarange on maratha reservationmaratha reservation newsअजित पवार बातमीमनोज जरांगे बातमीमराठा आरक्षण बातमी
Comments (0)
Add Comment