सर्वोच्च न्यायालय शहाणं की अध्यक्षपदी बसलेले दीडशहाणे शहाणे? आजचा निर्णय भाजपचं षडयंत्र: राऊत

मुंबई : मी सकाळीच म्हटलं होतं ही सगळी मॅचफिक्सिंग आहे, हे दुसरं काही नाही. प्रभू श्रीराम वडिलांना दिलेल्या वचनासाठी वनवासात गेले, आज शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी राजकीय पिता बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला वनवासात पाठविण्याचं काम केलं. ६६ वर्षांपूर्वी ज्या पक्षाची स्थापना बाळासाहेबांनी केली, त्या शिवसेनेची मालकी कुणाकडे हा निर्णय भाजपने नेमलेला व्यक्ती करणार का? ज्या विधानसभा अध्यक्षांची नेमणूक दिल्लीतून होते, जे दिल्लीचे आदेश पाळतात, जे दिल्लीच्या मेहरबानीवर खुर्चीत बसतात, त्यांना बाळासाहेबांची शिवसेना चोरमंडळाच्या हातात देण्याचा अधिकारी कुणी दिला? अशा शब्दात विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल करताना जे आज फटाके वाजवतायेत, त्यांची अवस्था इटलीतल्या मुसोलिनीसारखी होईल, असा संताप खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात व्यक्त केला.

आजचा निकाल हा कोणताही निर्णय नसून ते भाजपचं षडयंत्र आहे. दिल्लीच्या आदेशाने एका मराठी माणसाने दुसऱ्या मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची अशी अवस्था करणं हे अत्यंत अघोरी कृत्य आहे. तुम्ही शिवसेनेला कधीही मागे खेचू शकणार नाही, उलट शिवसेना नव्या जोमाने उभी राहिल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. कोण एकनाथ शिंदे, कोण भरत गोगावले, कोण एकनाथ शिंदे त्यांची लायकी काय? अशा शब्दांत निकालानंतर संजय राऊतांनी आपला संताप व्यत्त केला.

आमची घटना अवैध मग आमचे आमदार वैध कसे? त्यांना अपात्र का केलं नाही? उद्धव ठाकरेंचा सवाल

महाराष्ट्रद्रोह्यांना अपात्र ठरवणं हाच खरा निर्णय होता

खरं तर महाराष्ट्रद्रोह्यांना अपात्र ठरवणं हाच खरा निर्णय होता. प्रभू श्रीराम वडिलांना दिलेल्या वचनासाठी वनवासात गेले, आज शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी राजकीय पिता बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला वनवासात पाठविण्याचं काम केलं. राम हा सत्यवचनी होते, त्यामुळे रामाचं नाव घेण्याचं त्यांना अधिकार नाही. ज्या शिवसेनेनं तुम्हाला सगळं दिलं, त्या शिवसेनेला तुम्ही वनवासात पाठवलं, असा घणाघात राऊत यांनी केला.

दीड तासांच्या निकाल वाचनात पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांची याचिका फेटाळली, ठाकरेंचे आमदार पात्र, नार्वेकर काय म्हणाले?

आजचा निर्णय म्हणजे भाजपचं षडयंत्र

सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना भरत गोगावले यांचा व्हिप अवैध ठरवला. राज्यपालांची कृती बेकायदेशीर ठरवली. त्याउलट सर्वोच्च न्यायालयाने सुनील प्रभू यांचा व्हीप अधिकृत ठरवला. मग सर्वोच्च न्यायालय शहाणं की अध्यक्षपदी बसलेले दीडशहाणे शहाणे? असा बोचरा सवाल करून आजचा निर्णय म्हणजे भाजपचं षडयंत्र असल्याची टीका राऊत यांनी केली.

राहुल नार्वेकर यांचा मुख्य निकाल काय?

पक्षाची घटना, नेतृत्व आणि विधिमंडळातील बहुमत याचा अभ्यास करून एकनाथ शिंदे यांच्या गटाला मी खरी शिवसेना म्हणून मान्यता देतो, असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला.

त्याचवेळी एकनाथ शिंदे यांचे आमदार भरत गोगावले यांचा व्हिपही राहुल नार्वेकर यांनी वैध ठरवला आहे.

दुसरीकडे एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी निवड वैध ठरवत २१ जून २०२२ ला शिवसेनेमध्ये फूट पडली. त्यामुळे त्या तारखेनंतर सुनील प्रभूंचा व्हीप लागू होत नाही. तसेच सुनील प्रभूंना पक्षासाठी कोणतीही बैठक बोलावण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे शिंदे गटाच्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी फेटाळली.

एकनाथ शिंदे यांचा गट हीच खरी शिवसेना, शिंदेंचे सगळे आमदारही पात्र, राहुल नार्वेकर यांचा निकाल
त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या गटाचे व्हिप भरत गोगावले यांचा पक्षादेश ठाकरे गटाला किंबहुना ठाकरे गटातील सदस्यांना दिला असल्याचे पुरावे शिंदे गट सादर करू न शकल्याने त्यांची याचिका फेटाळून लावत असल्याचं सांगत एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही, असं राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.

Source link

rahul narwekarSanjay Rautshiv sena mlas disqualification caseUddhav Thackerayएकनाथ शिंदेराहुल नार्वेकरशिवसेना आमदार अपात्रता प्रकरणसंजय राऊत
Comments (0)
Add Comment