म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या बलात्काराच्या ‘लेटरबॉम्ब’ची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणात नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लैंगिक अत्याचाराची कोणतीही घटना घडली नसल्याचा दावा पोलिसांनी केला असून, आठ महिलांपैकी एकीच्या तक्रारीवरून त्यांच्या नावाने पत्र लिहिणाऱ्या, व्हायरल करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. हे पत्र दादर येथील पोस्ट कार्यालयातून पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत असून, तेथील सीसीटीव्ही फुटेजवरून तपासाला पुढील दिशा मिळणार आहे.
मुंबई पोलिसांच्या मोटार परिवहन विभागातील पोलिस उपायुक्त, दोन निरीक्षक आणि तीन कॉन्स्टेबल यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप करण्यात आलेले पत्र गेल्या आठवड्यात समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. याच विभागातील आठ महिलांच्या नावाचा वापर करून त्यांच्यावर झालेला कथित लैंगिक अत्याचार या पत्रामध्ये कथन करण्यात आला होता. या व्हायरल पत्राबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच पोलिस दलामध्येही त्याचे पडसाद उमटले. पोलिसांनी पत्रामध्ये नाव असलेल्या महिलांची चौकशी करीत लैंगिक शोषणाची कोणतीही घटना घडली नसल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला. पत्रात उल्लेख असलेल्या कोणत्याही महिलेने हे पत्र लिहिलेले नसल्याचे प्रथमदर्शनी दिसते. मात्र, या पत्रामुळे आठ महिला, त्यात उल्लेख करण्यात आलेले अधिकारी आणि मुंबई पोलिस दलाची बदनामी झाल्याने या पत्राची आणि त्यातील आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला.
मुंबई पोलिसांच्या मोटार परिवहन विभागातील पोलिस उपायुक्त, दोन निरीक्षक आणि तीन कॉन्स्टेबल यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप करण्यात आलेले पत्र गेल्या आठवड्यात समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. याच विभागातील आठ महिलांच्या नावाचा वापर करून त्यांच्यावर झालेला कथित लैंगिक अत्याचार या पत्रामध्ये कथन करण्यात आला होता. या व्हायरल पत्राबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच पोलिस दलामध्येही त्याचे पडसाद उमटले. पोलिसांनी पत्रामध्ये नाव असलेल्या महिलांची चौकशी करीत लैंगिक शोषणाची कोणतीही घटना घडली नसल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला. पत्रात उल्लेख असलेल्या कोणत्याही महिलेने हे पत्र लिहिलेले नसल्याचे प्रथमदर्शनी दिसते. मात्र, या पत्रामुळे आठ महिला, त्यात उल्लेख करण्यात आलेले अधिकारी आणि मुंबई पोलिस दलाची बदनामी झाल्याने या पत्राची आणि त्यातील आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला.
या पत्राद्वारे झालेल्या बदनामीमुळे नाहक त्रास झाल्याचे महिला पोलिस कॉस्टेबलने तक्रारीमध्ये म्हटले आहे. मोटार परिवहन विभागाचे कार्यालय नागपाडा परिसरात असल्याने या महिलेने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. याचा पहिला टप्पा म्हणजे हे पत्र लिहिणारा, पोस्टाने पाठविणारा आणि समाजमाध्यमावर व्हायरल करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ५००, ५०६, ५०९, ४६५ आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘कुणीवरही अन्याय होणार नाही’
पोलिस महासंचालकपद स्वीकारत असताना रश्मी शुक्ला यांना कथित प्रश्नाबाबत विचारले असता, या प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पण, कुणावरही अन्याय होणार नाही. सर्व प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास तपास केला जाईल, असे शुक्ला यांनी सांगितले.