काय आहे प्रकरण?
कैलास मसाजी साळवे (वय ५७, रा. रांजणगाव शेणपुंजी) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्यावर शुक्रवारी दुपारी रांजणगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी तरुणीचा चुलता व त्याच्या दोन मित्रांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…
संबंधित तरुणी व तरुणाचे प्रेम असल्याने दोघे ३१ डिसेंबरला पळून गेले होते. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात दिली होती. तिच्या कुटुंबीयांनी प्रेमीयुगुलाचा शोध घेतला. मात्र ते सापडले नाहीत. त्यामुळे तिचे नातेवाईक संतप्त झाले होते. चार जानेवारीला मध्यरात्री बेपत्ता तरुणीचे वडील बाबासाहेब गायकवाड यांनी तिच्या प्रियकराच्या भावाशी संपर्क साधून बोलावले. तो तेथे गेला असता, गणेश गायकवाड व त्याचे मित्र उद्धव घोलप व अर्जुन पिंफाळे दिसून आले. गायकवाड व घोलप यांनी कैलास साळवे यांना बेदम मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा गुरुवारी सायंकाळी सातला मृत्यू झाला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गणेश गायकवाड, उद्धव घोलप, अर्जुन पिंफाळे यांना पोलिसांनी अटक केली आहे.